Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Imtiaz Jaleel रावसाहेब दानवे यांचे मित्र! ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकर यांनी असं का म्हटलं?

Imtiaz Jaleel रावसाहेब दानवे यांचे मित्र! ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकर यांनी असं का म्हटलं?

| Updated on: Sep 18, 2023 | 8:37 AM

tv9 Special Report | औरंगाबादचं नाव अधिकृतरित्या छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर वादाला ठिणगी? ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा भाजप नेते रावसाहेब दानवे यांना खोचक टोला, बघा साधला निशाणा?

छत्रपती संभाजीनगर, १८ सप्टेंबर २०२३ | राज्य शासनानं अखेर औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर अधिकृतरित्या केलंय. औरंगाबादच्या नामांतराविरोधात इम्तियाज जलील कोर्टात जाणार आहेत. यावरुन ठाकरे गटाचे नेते ओमराजे निंबाळकरांनी भाजपला टोला लगावलाय. औरंगाबादचं नाव अधिकृतरित्या छत्रपती संभाजीनगर असं तर उस्मानाबादचं नाव धाराशिव असं झालंय. राज्य सरकारनं राजपत्र जारी करत याची घोषणा केलीय. दोन्ही शहरांचं नामांतर झाल्यानंतर नागरिकांनी जल्लोष केलाय. औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शवलाय. सरकारच्या निर्णयाविरोधात आपण कोर्टात जाणार असल्याचं जलील यांनी सांगितलंय. त्यावर ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी टोला मारलाय. इम्तियाज जलील हे भाजप नेते रावसाहेब दानवेंचे मित्र आहेत, त्यामुळं दानवेंनी जलील यांना कोर्टात जाण्यापासून रोखावं असं निंबाळकर म्हणाले आहेत.

काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमधल्या पत्रकार परिषदेतला रावसाहेब दानवे आणि इम्तियाज जलील यांचा व्हिड़ीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये काय म्हणाले होते. दानवे नेमके काय म्हणाले होते, बघा व्हिडीओ

Published on: Sep 18, 2023 08:37 AM