MSRTC Employees Strike : सरकार सकारात्मक मग आंदोलन का? मंत्री उदय सामंतांचा एसटी कर्मचाऱ्यांना सवाल

'एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक होतं, आहे आणि भविष्यातही राहणार आहे. कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये हीच भूमिका सरकारची राहिलेली आहे', असे मंत्री उदय सामंत म्हणाले. तर सरकार सकारात्मक असताना बेमुदत संप किंवा आंदोलन कशासाठी? असा सवालही त्यांनी केला.

MSRTC Employees Strike : सरकार सकारात्मक मग आंदोलन का? मंत्री उदय सामंतांचा एसटी कर्मचाऱ्यांना सवाल
| Updated on: Sep 04, 2024 | 10:51 AM

राज्यभरात गणेशोत्सवाची लगबग सुरू असताना गणेशोत्सव हा सण तोंडावर असताना एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. यामुळे राज्यभरातील लालपरीची चाकं थांबली आहे. दरम्यान, आज एसटी कर्मचाऱी कृती समिती आणि मंत्री उदय सामंत यांची राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाच्या मुद्यावरून बैठक झाली. यानंतर मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उदय सामंत यांनी एसटी कर्मचाऱ्यांना गणेशोत्सव तोंडावर असल्याने संप मागे घेण्याची विनंती केली. पुढे ते असेही म्हणाले की, सण आहे, सरकार सकारात्मक असताना, एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारची असताना आंदोलन कशासाठी? असा सवाल उदय सामंत यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केला. तर ४८ तासांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावर बैठक होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव तोंडावर असताना असं आंदोलन करणं कितपत योग्य आहे. याने जनतेतही उद्रेक होऊ शकतो, असेही उदय सामंत म्हणाले.

Follow us
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.