आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार

अकोला जिल्ह्यातील पातूर शहराजवळ हा भीषण अपघात झाला असून या घटनेत आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील व्यक्तींसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पातूर शहराजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये किरण सरानाईक यांचे पुतणे रघुवीर सरनाईक यांचा जागीच मृत्यू झाला आहे

आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
| Updated on: May 03, 2024 | 5:16 PM

आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर शहराजवळ हा भीषण अपघात झाला असून या घटनेत आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील व्यक्तींसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पातूर शहराजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये किरण सरानाईक यांचे पुतणे रघुवीर सरनाईक यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्यांना अकोला येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोन वाहनांची समोरासमोर धडक झाल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. वाशिम रोडवर दोन कारची एकमेकांना जोरदार धडक बसल्यानं ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात किरण सरानाईक यांचे पुतणे रघुवीर सरनाईक (वय २८) यांचा मृत्यू झाला आहे. तसेच शिवाजी आमले (वय ३०) सिद्धार्थ यशवंत इंगळे (वय ३५), तसेच एका नऊ महिन्यांच्या मुलासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले आहे. त्यात पियुष देशमुख (वय ११), सपना देशमुख आणि श्रेयस इंगळे यांचा समावेश आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.