Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Weather : मुंबईकरांनो काळजी घ्या, कारण उद्यापासून दोन दिवस... हवामान खात्यानं काय म्हटलं?

Mumbai Weather : मुंबईकरांनो काळजी घ्या, कारण उद्यापासून दोन दिवस… हवामान खात्यानं काय म्हटलं?

| Updated on: Apr 04, 2025 | 10:15 AM

संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर गेल्या दोन दिवसांपासून कोकणपट्ट्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं.

मुंबईकरांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत सर्वत्र दमट वातावरण असून उद्यापासून मुंबईत उन्हाचा कडाका वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय हवामान विभागाकडून गेल्या दोन दिवसापूर्वी मुंबईत अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हवामान विभागाकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईतील दादर, वरळी आणि परेळ भागात पावसाची रिमझिम पाहायला मिळाली. मात्र आज सकाळपासून मुंबईचं वातावरण काहीसं बदलल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईचं वातावरण काहिसं दमट आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबईतील कालच्या हवामानाचा विचार केला असता कुलाबा हवामान वेध शाळेच्या अंदाजानुसार, ३३.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर सांताक्रूझ वेध शाळेच्या अंदाजानुसार, ३४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान आज मुंबईत संपूर्ण ढगाळ वातावरण असलं तरी उद्यापासून दोन दिवस मुंबईतील तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज आहे.

Published on: Apr 04, 2025 10:15 AM