Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'लॉकडाऊन आवडे सरकारला' Raj Thackeray यांचा राज्य सरकारला टोला

‘लॉकडाऊन आवडे सरकारला’ Raj Thackeray यांचा राज्य सरकारला टोला

| Updated on: Aug 31, 2021 | 3:12 PM

राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. कोरोनाचे निर्बंध मुंबईतच का? बाहेरच्या राज्यांचं काय? जन आशीर्वाद यात्रा चालली तेव्हा तुमचा लॉकडाऊन नाही. सण आल्यावर लॉकडाऊन. सणांतून फक्त रोगराई पसरते. यात्रेतून नाही. यांच्या मेळाव्यातून आणि हाणामाऱ्यातून कोरोनाची लाट पसरली नाही.

राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. कोरोनाचे निर्बंध मुंबईतच का? बाहेरच्या राज्यांचं काय? जन आशीर्वाद यात्रा चालली तेव्हा तुमचा लॉकडाऊन नाही. सण आल्यावर लॉकडाऊन. सणांतून फक्त रोगराई पसरते. यात्रेतून नाही. यांच्या मेळाव्यातून आणि हाणामाऱ्यातून कोरोनाची लाट पसरली नाही. यांना पाहिजे तेवढं सुरू करतात, अशी टीका राज यांनी केली. गेल्या वर्षी दहीहंडी होती. पण साजरी केली नव्हती. गेल्यावेळची आणि आताच्या परिस्थितीत खूप फरक आहे. ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ हे पी साईनाथ यांचं पुस्तक आहे. तसं ‘लॉकडाऊन आवडे सरकारला’ असं सरकारचं झालं आहे. त्यात हजारो कोटींची कामे वाजवली जात आहेत. मोर्चे आंदोलन होऊ देत नाही. त्यामुळे वारंवार दुसरी, तिसरी लाट. चौथी लाट मुद्दामहून आणली जात आहे, असा दावा त्यांनी केला.