म्हणून मी शिवसेना सोडली, बाळासाहेबांना लिहिलेल्या 7 पानी पत्रात राणेंनी काय म्हटलं?

रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात भाजपचे उमेदवार नारायण राणेंनी आपला जोरदार प्रचार सुरू केला आहे. रत्नागिरीतील प्रचारसभेत बोलताना नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली तर शिवसेना सोडण्यामागचं खरं कारणही त्यांनी बोलून दाखवलं. बघा काय म्हणाले नारायण राणे?

म्हणून मी शिवसेना सोडली, बाळासाहेबांना लिहिलेल्या 7 पानी पत्रात राणेंनी काय म्हटलं?
| Updated on: May 01, 2024 | 4:53 PM

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी होणार असून या टप्प्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात मतदान होणार आहे. दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात भाजपचे उमेदवार नारायण राणेंनी आपला जोरदार प्रचार सुरू केला आहे. रत्नागिरीतील प्रचारसभेत बोलताना नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली तर शिवसेना सोडण्यामागचं खरं कारणही त्यांनी बोलून दाखवलं. नारायण राणेंनी एक किस्सा सांगताना असे म्हटले की, बाळासाहेबांना 7 पानी पत्र दिले आणि उद्धव ठाकरेंमुळे शिवसेना सोडली. उद्धव ठाकरे आणि माझं जमणार नाही अस साहेबांना सांगितलं, असं सांगतानाच बाळासाहेब ठाकरेंमुळे मी घडलो. ह्याचं दुकान बंद केलं पाहिजे. आता चूक करू नका. तुमचं आमचं तरुण पिढीच भवितव्य बदलायचं असेल तर मोदींना मतं द्या, असं आवाहन राणेंनी केलं. तर ठाकरेंवर टीका करताना राणे म्हणाले, उद्धव ठाकरे आणि विनायक राऊत यांना प्रत्येक कामात पैसे पाहिजेत. मोदी, शाह आणि फडणवीस यांच्यावर टीका करता. तुम्ही अडीच वर्षात काय झक मारली ते पाहा. तू केवढा आहेस? जनाची नाय तर मनाची तरी लाज बाळग. योगायोगाने हिंदुत्वाशी गद्धारी करून शरद पवार यांच्या मांडीवर बसून मुख्यमंत्री झालास, असे म्हणत नारायण राणेंनी हल्लाबोल केला.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.