जागावाटपावरून महायुतीत वादाची ठिणगी; रामदास कदम संतापले अन् म्हणाले, ‘सर्व पक्षांना संपवून भाजपला फक्त…’

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर आपला दावा सांगितल्यानंतर रामदास कदमांनी थेट भाजपवरच हल्लाबोल केलाय. रामदास कदमांनी मित्रपक्षावर केलेल्या टीकेनंतर विरोधकांना महायुतीला डिवचण्याची आयती संधी मिळाली.

जागावाटपावरून महायुतीत वादाची ठिणगी; रामदास कदम संतापले अन् म्हणाले, 'सर्व पक्षांना संपवून भाजपला फक्त...'
| Updated on: Mar 03, 2024 | 11:32 AM

मुंबई, ३ मार्च २०२४ : लोकसभेच्या जागावाटपावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम चांगलेच संतापलेत. रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरून त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय. सर्व पक्षांना संपवून भाजपला एकट्याला जीवंत राहायचंय का? असा सवाल उपस्थित करून रामदास कदम यांनी टिकास्त्र डागलंय. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा आपल्या मित्रपक्षांवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर आपला दावा सांगितल्यानंतर रामदास कदमांनी थेट भाजपवरच हल्लाबोल केलाय. रामदास कदमांनी मित्रपक्षावर केलेल्या टीकेनंतर विरोधकांना महायुतीला डिवचण्याची आयती संधी मिळाली. रामदास कदमांनी आपली खदखद व्यक्त केली तर गद्दारीची किंमत त्यांना मोजावी लागेल असा टोला वैभव नाईक यांनी रामदास कदमांना लगवाला आहे. दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील ठाकरे गटाचे आमदार विनायक राऊतांनी शिंदे आणि भाजपवर सडकून टीका केली. गद्दार आणि बेइमान गट एकमेकांच्या उरावर बसतील अशी टीका विनायक राऊतांनी केली. बघा कुणी काय केले आरोप-प्रत्यारोप?

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.