AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा असेल तर...; संभाजीराजे छत्रपती यांनी राजकारण्यांना सुनावलं

सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा असेल तर…; संभाजीराजे छत्रपती यांनी राजकारण्यांना सुनावलं

| Updated on: Apr 06, 2023 | 7:49 AM

Sambhajiraje Chhatrapati on Maharashtra Politics : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकमेकांवरील व्यक्तीगत टीकेवर संभाजीराजे यांची टिप्पणी; म्हणाले...

सांगली : संभाजीराजे छत्रपती यांनी राजकारण्यांना सुनावलं आहे. त्यांनी राजकारण्यांच्या सध्याच्या भाषेवर बोट ठेवलं आहे. “व्यक्ती दोष ठेवून राजकारण करू नये. विकासाच्या बाबतीत कुणी चुकत असेल तर जरूर बोलावं. पण व्यक्ती द्वेष करणं, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा असेल तर विकासावर बोलावं. सत्तेत असणाऱ्या आणि नसणाऱ्यांनी व्यक्ती द्वेष न करता बोललं पाहिजे, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत. लोकांना आवडतात म्हणून काहीही बोलण्यापेक्षा, महाराष्ट्र किती अडचणीतून चालला आहे, त्याला नवी दिशा कशी देता येईल यावर बोलणं सध्या गरजेचं आहे. सकल मराठा समाज आयोजित मराठा क्रिकेट प्रीमियर लीगच्या सामन्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. तेव्हा माध्यमांशी संवाद साधताना छत्रपती संभाजीराजे यांनी राजकारण्यांना खडे बोल सुनावले आहेत.

Published on: Apr 06, 2023 07:47 AM