सर्वपक्षीय बैठकीतून मी निराशेने बाहेर पडलो…., जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होती. या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवत सर्वपक्षीय नेत्यांचे मराठा आरक्षण देण्यासंदर्भात एकमत झाले. मात्र या बैठकीवर शेकापचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वपक्षीय बैठकीतून मी निराशेने बाहेर पडलो...., जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?
| Updated on: Nov 01, 2023 | 9:05 PM

मुंबई, १ नोव्हेंबर २०२३ | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होती. या बैठकीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचे मराठा आरक्षण देण्यासंदर्भात एकमत झाले. तर क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलेलं आहे. त्रुटी काढून आम्ही आरक्षण देऊ, असे म्हणत सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली. मात्र या बैठकीवर शेकापचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी निराश झालो. ज्या पद्धतीने मराठा आरक्षणासंदर्भात जो ठाम निर्णय घ्यायला हवा होता तो झाला नाही. मनोज जरांगे यांचा जीव वाचला पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला. यानंतर राज्य सरकारकडून कोणता तरी निर्णय होईल. पण त्याबाबतचा कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे मी निराश होऊन या सर्वपक्षीय बैठकीतून बाहेर पडलो.’, अशी थेट प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.