हिंगोली, २६ ऑगस्ट २०२३ | कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात 28 ऑगस्ट रोजी कालीचरण महाराज यांच्या उपस्थितीत कावड यात्रा निघणार आहे. या कावड यात्रेत एक लाख शिव फक्त सहभागी होणार असल्याचेही आमदार बांगर यांनी सांगितले आहे. पुढे ते असेही म्हणाले, आम्ही तीन महिन्यांपासून कावड यात्रेची तयारी करत आहे. हिंगोलीत सर्वात मोठी कावड यात्रा दरवर्षी होत असते पण विरोधकांकडून हेतू पुरस्कर उद्धव ठाकरे यांची सभा ठेवली आहे. उद्धव ठाकरे उद्या हिंगोलीत येणार आहेत त्याचं तुम्ही स्वागत करणार का..? असा सवाल केला असता उद्धव ठाकरे यांच आमच्या वतीने स्वागतच आहे. बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत पण आजूबाजूच्या चेलेचपाटे आहेत त्यांच्यामुळे शिवसेनेची हाल झाली आहे.