AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | अटक करा म्हणणारे Kirit Somaiya नेमके कुठे गेलेत? -Tv9

Special Report | अटक करा म्हणणारे Kirit Somaiya नेमके कुठे गेलेत? -Tv9

| Updated on: Apr 11, 2022 | 9:32 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात मिस्टर इंडियाचा पॅटर्न रुढ होऊ पाहतोय. म्हणजे ज्यांच्यावर आरोप झालेत, किंवा गुन्हा दाखल झाला. ते नेतेमंडळी नंतर फरार किंवा नॉट रिचेबल होतायत. मागच्या 7 महिन्यात 7 जणांवर आरोप झालेत.योगायोगानं ते सातही जण गायब होऊन नंतर काही दिवसांनी प्रकटलेआणि आता राऊतांनी सोमय्या बाप-बेटे फरार असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात मिस्टर इंडियाचा पॅटर्न रुढ होऊ पाहतोय. म्हणजे ज्यांच्यावर आरोप झालेत, किंवा गुन्हा दाखल झाला. ते नेतेमंडळी नंतर फरार किंवा नॉट रिचेबल होतायत. मागच्या 7 महिन्यात 7 जणांवर आरोप झालेत.योगायोगानं ते सातही जण गायब होऊन नंतर काही दिवसांनी प्रकटलेआणि आता राऊतांनी सोमय्या बाप-बेटे फरार असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. 9 एप्रिलच्या या पत्रकार परिषदेपासून किरीट सोमय्या नॉट रिचेबल आहेत.  आधी पुरावे द्या., नंतर मी स्वतः तुरुंगात येतो., असं आव्हान सोमय्यांनी शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत दिलं होतं. मात्र दिवसानंतर सोमय्यांचा फोन नॉट रिचेबल झालाय. संजय राऊतांच्या दाव्यानुसार सोमय्या पिता-पुत्र दोघंही सध्या मुंबई किंवा महाराष्ट्रात नाहीयत. आरोपानंतर प्रकरण कोर्टात गेलं की फरार किंवा नॉट रिचेबल होण्याचा पायंडा महाराष्ट्रात रुढ होतोय.