… म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी

सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिकांचा जामीन रद्द करावा, त्यांच्याकडे पाहून असे दिसते की त्यांची प्रकृती पूर्णपणे ठीक आहे. त्यांना कोणत्याही उपचारांची आवश्यकता नाही, भाजप नेत्यानं नवाब मलिक यांच्याबद्दल नेमकं काय म्हटलं?

... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी
| Updated on: Dec 08, 2023 | 3:48 PM

मुंबई, ८ डिसेंबर २०२३ : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजिच पवार यांना नवाब मलिक यांच्यासंदर्भात एक पत्र लिहिले आणि राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच नवाब मलिक यांना देण्यात आलेला जामीन रद्द करा आणि त्यांना पुन्हा तुरूंगात टाका, अशी मागणी भाजपच्या नेत्यानं केली आहे. नवाब मलिक यांची प्रकृती पूर्णपणे ठीक आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा जेलमध्ये पाठवा, असे म्हणत भाजप नेते मोहित कंबोज यांनी अधिवेशनाला लावलेल्या उपस्थितीवरून ही मागणी केली आहे. नागपूर येथील विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान वैद्यकीय उपचारासाठी जामीन दिला असल्याने सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिकांचा जामीन रद्द करावा, त्यांच्याकडे पाहून असे दिसते की त्यांची प्रकृती पूर्णपणे ठीक आहे. त्यांना कोणत्याही उपचारांची आवश्यकता नाही. त्यामुळे त्यांना तातडीने आर्थर रोड जेलमध्ये परत पाठवावे, असे त्यांनी म्हटले आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.