AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळीनंतर राज्यावर येणार 'हे' संकट; मुख्यमंत्र्यांनी दिल्या काय सुचना?

अवकाळीनंतर राज्यावर येणार ‘हे’ संकट; मुख्यमंत्र्यांनी दिल्या काय सुचना?

| Updated on: Apr 21, 2023 | 9:41 AM

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे उन्हाचा तडाखा तर अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे

मुंबई : राज्यात अवकाळी पावसाचा सध्या कहर सुरू आहेच. राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. अवकाळी पाऊस राज्यात बरसतो आहे. ढगाळ वातावरण, मुसळधार आणि वारावादळ यांमुळे काढणीला आलेल्या पिकाचे, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्याच्या अनेक भागांत गारपिटीचा तडाखा बसल्याने गहू, कांदा, मका, हरभऱ्यासह डाळिंब, द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे उन्हाचा तडाखा तर अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. यापाठोपाठ आता राज्याच्या नशिबी दुष्काळाच्या झळा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार योजना आणि इतर पाणी योजना तात्काळ सुरू करण्याच्या सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

Published on: Apr 21, 2023 09:41 AM