पुणे अपघात प्रकरणावर वसंत मोरे म्हणाले, आपल्या पुण्याच्या काही नेत्यांची कीव येते कारण…
कल्याणी नगर येथे हिट अँड रनचा जो प्रकार घडला, त्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच रंगलं आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून वंचित बहुजन आघाडीमध्ये आलेल्या वसंत मोरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कोरेगाव पार्कमधील कल्याणी नगर येथे हिट अँड रनचा जो प्रकार घडला, त्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच रंगलं आहे. या प्रकरणावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे. तर अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून वंचित बहुजन आघाडीमध्ये आलेल्या वसंत मोरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. कोरेगाव पार्क मध्ये जो अपघात झाला, तो दुर्देवीच होता. पण त्यामागून जे राजकारण चालू दिसतंय त्यामध्ये आपल्या पुण्याच्या काही नेत्यांची कीव येते, असं म्हणत वसंत मोरे यांनी खोचक टोला लगावला आहे. तर नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्क मध्येच आहे का? असा खोचक सवाल करत वसंत मोरे यांनी असेही म्हटले की, ज्यांनी पुढाकार घेऊन कारवाया लावल्या, त्या कोथरूडमधील पुढाऱ्यांनी जरा आपल्या भागातील नाईट लाईफ विषयी लक्ष द्यावे.

हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात

नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर

2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?

लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले
