मराठवाड्यातील पाणी प्रश्न मिटला, कुठल्या धरणातून किती पाणी सोडणार?
गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील पाणी प्रश्नांवर राज्यात चर्चा सुरू होती. दरम्यान, मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर मोठी बातमी समोर आली आहे. त्यामुळे मराठवाड्याचा पाणी प्रश्न आता मिटणार असल्याचे सांगितले जात आहे. उत्तर महाराष्ट्राच्या धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडलं जाणार
मुंबई, २१ नोव्हेंबर २०२३ : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील पाणी प्रश्नांवर राज्यात चर्चा सुरू होती. दरम्यान, मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर मोठी बातमी समोर आली आहे. त्यामुळे मराठवाड्याचा पाणी प्रश्न आता मिटणार असल्याचे सांगितले जात आहे. उत्तर महाराष्ट्राच्या धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडलं जाणार आहे. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यानुसार उत्तर महाराष्ट्रातील धरणांमधून जायकवाडी धरणात 8.5 टीएमसी पाणी सोडलं जाणार आहे. अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडलं जाणार आहे. तर मुळा (मांडओहोळ मुळा) प्रकल्पातून 2.19 टीएमसी पाणी सोडलं जाईल आणि प्रवरा (भंडारदरा, निळवंडे, आढळा, जापूर) प्रकल्पातून 3.36 टीएमसी पाणी सोडलं जाणार आहे, गंगापूर धरणातून (गोदावरी, काश्यपी, गौतमी गोदावरी) येथून 0.5 टीएमसी तर गोदावरी दारणा (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) येथून पाणी सोडलं जाणार आहे.

करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?

ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा

पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?

'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
