Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chickpea Crop : हरभरा खरेदी केंद्राला पुन्हा ‘ब्रेक’, खुल्या बाजारपेठेतील दरांवर काय परिणाम?

खुल्या बाजारपेठेपेक्षा खऱेदी केंद्रावर हरभऱ्याला जवळपास 1 हजार रुपये अधिचा दर होता. दरातीव वाढत्या तफावतीमुळे शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राचा आधार घेण्याचे ठरवले होते. त्यामुळे हरभरा खरेदी केंद्रावरील आवक तर वाढलीच शिवाय शेतकऱ्यांनाही याचा फायदा झाला. रब्बी हंगामात हरभऱ्याचा विक्रमी पेरा झाला होता. त्यामुळे आवक वाढणार हे निश्चित असल्याने बाजारपेठेतील दर घसरणीला सुरवात झाली होती.

Chickpea Crop : हरभरा खरेदी केंद्राला पुन्हा 'ब्रेक', खुल्या बाजारपेठेतील दरांवर काय परिणाम?
हरभऱ्याच्या आयातीमध्ये मोठी घट झाली आहे.
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 3:27 PM

लातूर : दोन महिन्यापासून हरभरा उत्पादकांना खरा दिलासा मिळाला तो (Chickpea Crop) हऱभऱा खरेदी केंद्राचा. हंगामाच्या सुरवातीला (MSP) हमी भाव केंद्रावर अधिकचा दर असताना देखील शेतकरी (Open Market) खुल्या बाजारात कमी दराने विक्री करीत होते. मात्र, हंगामाचा शेवट असा काय झाला आहे की खरेदी केंद्र बंद होऊन दोन दिवस उलटले तरी शेतकऱ्यांना आशा आहे की, खरेदी केंद्र होतील. पण प्रत्यक्षात गेल्या दोन महिन्यात हरभऱ्याची विक्रमी खरेदी झाल्याने नाफेडचे उद्दिष्टच साधल्याने राज्यभरातील खरेदी पुन्हा बंद झाली आहेत. 23 मार्च रोजी केंद्र बंद झाल्याने प्रचंड नाराजी पसरली होती. शेतकऱ्यांचा रेटा आणि राज्यभर भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने खरेदी केंद्र सुरु झाली होती. पण शुक्रवारी हरभऱा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगत राज्यातील हरभऱा खरेदी केंद्र पुन्हा बंद करण्यात आली आहेत.

खरेदी केंद्र बंद होताच खुल्या बाजारपेठेत परिणाम

खुल्या बाजारपेठेपेक्षा खऱेदी केंद्रावर हरभऱ्याला जवळपास 1 हजार रुपये अधिचा दर होता. दरातीव वाढत्या तफावतीमुळे शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राचा आधार घेण्याचे ठरवले होते. त्यामुळे हरभरा खरेदी केंद्रावरील आवक तर वाढलीच शिवाय शेतकऱ्यांनाही याचा फायदा झाला. रब्बी हंगामात हरभऱ्याचा विक्रमी पेरा झाला होता. त्यामुळे आवक वाढणार हे निश्चित असल्याने बाजारपेठेतील दर घसरणीला सुरवात झाली होती. आता खरेदी केंद्र बंद झाल्याने खुल्या बाजारपेठेशिवाय पर्यांयच नसल्याने पुन्हा आहे त्या दरात घट होऊ नये. कारण आता खरेदी केंद्रावरील गर्दी थेट बाजारपेठेत होणार आहे.

आठवड्याभरात दोनदा खरेदी केंद्र बंद

23 मार्च रोजी अचानक राज्यभरातील खरेदी केंद्र ही बंद झाली. याबाबत शेतकरीच काय पण केंद्र चालकही अनभिज्ञ होते. अचानक निर्णयामुळे शेतकऱ्यांची तर हेळसांड झालीच पण केंद्रावरील मालाचे करायचे काय असा सवाल होता. मात्र, शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत असतानाच पुन्हा 18 जूनपर्यंत केंद्र सुरु झाल्याचा निर्णय झाला पण आता अजून उद्दिष्टापेक्षा अधिक हरभरा खरेदी झाल्याने हा निर्णय घेतल्याचे नाफेडच्या वतीने सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

दरामध्ये होणार घट

हरभरा खरेदी केंद्रावर नोंदणी आणि विक्री अशी प्रक्रिया पार पाडावी लागते. केंद्रावर हरभऱ्याला 5 हजार 230 असा दर ठरवून दिला होता. तर बाजारपेठेत 4 हजार 600 पर्यंत दर आहे. आता खरेदी केंद्र बंदच झाल्याने खरेदी केंद्रावरचा माल खुल्या बाजारपेठेमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे दरात आणखीन घट होण्याचा धोका अधिक आहे.

वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.