Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cotton Crop : यंदाही कापसाची झळाळी कायम राहणार, खरिपात क्षेत्र वाढण्याचा कृषी विभागाचा अंदाज

कापूस पीक मराठवाड्यातून हद्दपार होत असले तरी विदर्भात मात्र वाढत आहे. पण यंदाच्या हंगामातील दर पाहता पुन्हा शेतकरी कापूस लागवडीवर भर देणार असल्याचा अंदाज कृषी विभागानेच व्यक्त केला आहे शिवाय यंदाही कापूस शेतकऱ्यांना मालामाल करणार असे संकेतही कृषितज्ञांनी दिले आहेत. त्यामुळे खरिपात क्षेत्र वाढल्यानंतर पुन्हा परस्थिती काय राहणार हे पहावे लागणार आहे.

Cotton Crop : यंदाही कापसाची झळाळी कायम राहणार, खरिपात क्षेत्र वाढण्याचा कृषी विभागाचा अंदाज
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 5:15 AM

जळगाव : कापूस पीक मराठवाड्यातून हद्दपार होत असले तरी विदर्भात मात्र वाढत आहे. पण यंदाच्या हंगामातील दर पाहता पुन्हा शेतकरी (Cotton Crop) कापूस लागवडीवर भर देणार असल्याचा अंदाज (Agricultural Department) कृषी विभागानेच व्यक्त केला आहे शिवाय यंदाही कापूस शेतकऱ्यांना मालामाल करणार असे संकेतही कृषितज्ञांनी दिले आहेत. त्यामुळे (Kharif Season) खरिपात क्षेत्र वाढल्यानंतर पुन्हा परस्थिती काय राहणार हे पहावे लागणार आहे. उत्पादनात घट झाल्याने हंगमात विक्रमी दर मिळाला होता. शिवाय कापसावरील आयतशुल्क माफ केल्यानंतरही कापसाचा तोरा हा कायम आहे. मराठवाड्यातील परभणी बाजार समितीमध्ये तर 12 हजार असा विक्रमी दर मिळत आहे. त्यामुळे विदर्भासह मराठवाड्यात पुन्हा कापूस बहरलेला दिसेल यात शंका नाही.

सुतगिरण्यांना अनुदानाचा परिणाम कापूस मागणीवर

सन 2013 ते 2018 पर्यंत कॉटन मार्केटमध्ये मंदी आली होती. त्यामुळे देशातील अनेक सुतगिरण्या ह्या बंद झाल्या होत्या. त्यामुळे ज्या प्रमाणात मागणी पाहिजे होती तसे कधी झालेच नाही. घटलेल्या मागणीचा परिणाम थेट कापसाच्या दरावर दिसून आला. शिवाय बोंडअळीमुळे होणारे नुकसान लक्षात घेता क्षेत्रही घटले होते. मात्र, 2019 पासून शासनाने पुन्हा सुतगिरण्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बंद पडलेल्या गिरण्या सुरु झाल्या असून मागणीमध्येही वाढ झाली आहे. विशेषत: प्रतिकूल परस्थितीमध्येही विदर्भात कापसाचे क्षेत्र वाढले आहे. त्याचाच फायदा यंदाच्या हंगामात झाला आहे.

भारतामध्ये कापसाचे एकूण उत्पादन

काळाच्या ओघात क्षेत्रात घट झाली असली तरी उत्पादनात मात्र वाढ आहे. देशात 3 कोटी 60 लाख गाठी एवढा कापूस बाजारात विक्रीसाठी दाखल होतो. तर 3 वर्षापूर्वी 2 कोटी 80 लाख गाठींची मागणी केली जात होती. आता मागणीमध्ये वाढ झाली असून वर्षाकाठी 3 कोटी 40 लाख गाठींची मागणी आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दराचाही शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. 60 ते 70 लाख गाठींची निर्यात देशातून होत असते.

यामुळे कापसाच्या दरात राहणार सातत्य

यंदा उत्पादनात घट झाली म्हणून कापसाला विक्रमी दर मिळाला असला तरी हीच परस्थिती आगामी काळात राहणार आहे. क्षेत्र वाढले तरी मागणीच्या तुलनेत पुरवठा होणे शक्य नसल्याने दर कायम राहणार आहेत. यंदाच्या विक्रमी दराचा फायदाही शेतकऱ्यांना झाला आहे. हंगाम सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांजवळ जुना माल शिल्लक राहणार नाही. त्यामुळे नवीन मालालाच अधिकची मागणी राहणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मागणी कायम आहे. त्यामुळे भारतामधून निर्यात होणाऱ्या कापसाला अधिकचा दर राहणार आहे.

12 हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहचला कापूस

हंगामाच्या सुरवातीपासूनच कापसाचा तोरा काही वेगळाच होता. शिवाय अधिकच्या दराची शेतकऱ्यांनीही प्रतिक्षा केली. योग्य दर मिळाल्याशिवाय विक्री नाही ही भूमिका महत्वाची ठरली. त्यामुळे हंगामाच्या अंतिम टप्प्यात 12 हजार रुपये असा दर मिळत आहे. केंद्र सरकारने आयातशुल्क माफ केले असले तरी त्याचा परिणाम हा दरावर झालेला नाही. राज्यातील सुतगिरण्यांची मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थिती पाहता 8 ते 9 हजारापेक्षा दर कमी होणार नाहीत असा अंदाज कृषितज्ञांचा आहे.

संबंधित बातम्या :

Summer Crop: मका पिकाला अमेरिकन लष्करी अळीने घेरले, उत्पादनात घट अन् चाऱ्याचाही प्रश्न

Raju Shetti On Sharad Pawar: शरद पवार ऊस उत्पादकांना आळशी म्हणालेच कसे? त्यांच्या ज्ञानाबाबत माझा गैरसमज, राजू शेट्टींचे आक्षेप काय?

Marathwada : 3 लाख क्विंटल हरभऱ्याला हमीभावाचा ‘आधार’, कृषी विभागानेच केली शेतकऱ्यांची अडचण..!

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.