AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Soybean Damage : सोयाबीन पिकलं अन् शेतातच कुजलं, हे सर्व रस्त्याअभावी लातुरात घडलं..!

आतापर्यंत निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतीमालाचे नुकसान झालं इथपर्यंत ठीक होतं. पण नुकसान व्हायचंच म्हटल्यावर ते कसंही घडून येतंच. असाच काहीसा प्रकार लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हत्तरगा शिवारात झाला आहे. सोयाबीन काढणी, मळणी होऊन आता तीन महिने उलटले तरी रस्त्याअभावी सोयाबीन हे बाजारात सोडा घरी देखील आणता आलेले नाही. रस्त्याअभावी हत्तरगा येथील नामदेव सावंत यांचे तीन लाखाचे नुकसान झाले आहे.

Soybean Damage : सोयाबीन पिकलं अन् शेतातच कुजलं, हे सर्व रस्त्याअभावी लातुरात घडलं..!
मळणीविना सोयाबीन पिकाचे नुकसान
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 3:11 PM

लातूर : आतापर्यंत निसर्गाच्या अवकृपेमुळे (Loss of agricultural goods) शेतीमालाचे नुकसान झालं इथपर्यंत ठीक होतं. पण नुकसान व्हायचंच म्हटल्यावर ते कसंही घडून येतंच. असाच काहीसा प्रकार (Latur District) लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हत्तरगा शिवारात झाला आहे. सोयाबीन काढणी, मळणी होऊन आता तीन महिने उलटले तरी रस्त्याअभावी सोयाबीन हे बाजारात सोडा घरी देखील आणता आलेले नाही. (Farm Road) रस्त्याअभावी हत्तरगा येथील नामदेव सावंत यांचे तीन लाखाचे नुकसान झाले आहे. रस्ता तर नाहीच पण शेजारच्या शेतकऱ्यांनी उभ्या पिकामध्ये वाहन घालण्यास विरोध केल्याने सोयाबीनचे नुकसान झाले आहे. एवढ्या दिवस सावंत यांनी साठवणूक केली मात्र, मध्यंतरीची अवकाळी आणि आताचे ऊन यामुळे सोयाबीन कुजले आहे. रस्त्या अभावी सोयाबीन कुजल्यामुळे या शेतकऱ्याने निलंगा तहसील कार्यलयात आत्महत्या करण्याचा इशारा दिलेला आहे .

सोयाबीन बनीमची कथा

सोयाबीनची रास रस्ता नसल्याने सुमारे 40 क्विंटलची बनीम जागेवरच कुजून जात आहे. अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला रस्ता नसल्यामुळे सोयाबीनचे तीन लाखाचे नुकसान सोसावे लागत आहे.रस्ता खुला करुन द्यावा अशी मागणी नामदेव सावंत यांनी तहसील कार्यालय निलंगा यांच्याकडे केली आहे. शिवाय शेतकऱ्यांची रास करण्यासाठी तात्पुरती सोय म्हणून तहसीलदार यांनी पोलीस स्टेशनला चार दिवसांपूर्वी पत्र दिले आहे. मात्र, पत्र मिळाले नसल्यामुळे आम्ही काहीच कारवाई करू शकत नाही असे पोलिसांनी सांगितले आहे. या वादात सोयाबीन बनीम मात्र प्रतिक्षेत आहे.

सावंत दाम्पत्याचा आत्महत्या करण्याचा इशारा

हत्तरगा(हालसी) येथील नामदेव सावंत शेतकऱ्यांनी 20 वर्षापूर्वी जमीन विकत घेतली होती. जमिनीचा रस्ता आडवल्याने सोयाबीन चीरास अध्याप झाली नाही त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे सुमारे तीन लाखाचे नुकसान झाले असून वारंवार प्रशासन दरबारी रस्त्याबाबत मागणी करून ही रस्ता न मिळाल्याने हे नुकसान झाले असल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाकडे दिली आहे. शिवाय रस्ता नाही मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा नामदेव सावंत व त्यांची पत्नी या दोघांनीही तहसील कार्यालया समोर दिला.

मूळ मालकालाच वाट नाही

गुंडेराव सावंत यांची वडिलोपार्जित बारा एकर जमीन होती. यातील तीन एकर जमीन नामदेव सावंत यांनी प्रभावती रावसाहेब माने यांना सन 2002 मध्ये विकली. काही दिवसांनी या जमीन घेतलेल्या शेतकऱ्यांनी रस्ता ताब्यात घेऊन संपूर्ण रस्ता आडवला त्यामुळे मूळ मालकाला शेताकडे जाण्यासाठी रस्ताच शिल्लक राहिला नाही. याबाबत मूळ शेतमालक नामदेव गुंडेराव सावंत यांनी संबंधित विभागात तहसील कार्यालयात रस्त्याबाबत मागणी केली व संबंधित जमिनीबाबत रस्ता असल्याचे दस्तऐवज दाखल केले. यावरून नायब तहसीलदार घनश्‍याम आडसूळ यांनी हा रस्ता करून घेण्याबाबत सूचना केल्या तसे पत्रही देण्यात आले.

संबंधित बातम्या :

Sugarcane Cane : मराठवाड्याच्या मदतीला पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने..! गावनिहाय नियोजनातून मिटेल का अतिरिक्त ऊसाचा प्रश्न?

Grape : द्राक्ष उत्पादकांवर आता दुहेरी संकट, हंगामाच्या अंतिम टप्प्यात सर्वकाही गमावले..!

आता मोबाईलच्या माध्यमातूनही PM Kisan Sanman Nidhi योजनेची नोंदणी, जाणून घ्या सर्वकाही..!

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक.
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य.
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं.
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?.
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड.
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र.
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?.
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?.
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण.