AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mango : आवक वाढली अन् दरही, यंदा आंब्याची चव चाखायला मिळणार की नाही..!

निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक परिणाम हा फळपिकांवर झालेला आहे. यामध्ये द्राक्ष आणि आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरवर्षी आंब्याची आवक वाढली की दरात घट होते. पण यंदा चित्र उलटे आहे. आता पुणे, मुंबई यासारख्या बाजारपेठांमध्ये कोकणातील देवगड, संगमेश्वर, पावस, राजापूर, सावंतवाडी या भागातून आंब्याची आवक वाढली आहे.

Mango : आवक वाढली अन् दरही, यंदा आंब्याची चव चाखायला मिळणार की नाही..!
तिसऱ्या मोहरातील आंब्याचे उत्पादन वाढल्याने दरात मोठी घसरण झाली आहे.Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 10:12 AM

पुणे : अवकाळीच्या कचाट्यातून सुटका झालेला (Mango) आंबा आता बाजारपेठेत दाखल होऊ लागला आहे. यापूर्वीच्या हंगामातील आंब्याचे अवकाळी पाऊस आणि वाढत्या उन्हामुळे नुकसानच झाले होते. त्यामुळे मागणी असतानाही बाजारपेठेत (Mango Arrival) आवकच नसल्याने खवय्यांना आंब्याची चवच चाखायला मिळालेली नाही. तर आता आंब्याची आवक वाढली असताना दरही गगणाला भिडले आहेत. त्यामुळे यंदा सर्वसामान्यांच्या नशिबी आंबा आहे की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील (Mango Market) मुख्य बाजारपेठांमध्ये कोकणातून आंब्याची आवक सुरु झाली आहे. मात्र, अक्षतृतीयापर्यंत आंब्याच्या दरात तेजी कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे कधी घटती आवक तर कधी वाढलेले दर यामुळे खवय्येगिरींचा हिरमोड होत आहे.

उत्पादन घटल्याने दरात वाढ

निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक परिणाम हा फळपिकांवर झालेला आहे. यामध्ये द्राक्ष आणि आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरवर्षी आंब्याची आवक वाढली की दरात घट होते. पण यंदा चित्र उलटे आहे. आता पुणे, मुंबई यासारख्या बाजारपेठांमध्ये कोकणातील देवगड, संगमेश्वर, पावस, राजापूर, सावंतवाडी या भागातून आंब्याची आवक वाढली आहे. असे असले तरी आवकच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने हापूसला 800 ते 1 हजार 200 असा प्रति डझन दर आहे.

कोकणपट्ट्यातून आंब्याची आवक

कोकणातील विविध जिल्ह्यामधून सध्या पुणे कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये आंब्याची आवक सुरु आहे. दिवसाकाठी 10 ते 15 हजार पेट्यांची आवक सुरु आहे. तर कर्नाटकातून 2 डझनाच्या अशा 5 ते 6 हजार बॉक्स दिवसाकाठी बाजारपेठेत दाखल होत आहे. अक्षयतृतीयाच्या अनुशंगाने सध्या आवक वाढली असली तरी दरात घट झालेली नाही. मूळात आंब्याचे उत्पादनच घटले असल्याने दर चढेच राहतील असा अंदाज आहे. पण अक्षयतृतीयानंतर यामध्ये बदल होईल ही अपेक्षा व्यापाऱ्यांना आहे.

हे सुद्धा वाचा

असे आहेत आंब्याचे दर

हापूसची 4 ते 5 डझनची पेटी ही 800 ते 1 हजार 200 रुपयांपर्यंत पुणे बाजारपेठेत मिळत आहे. तर पायरी आंब्याची 800 ते 1 हजार रुपयांपर्यंत पेटी मिळत आहे. पायरी आंबा प्रतिकिलो 50 ते 60 रुपये तर हापूस 50 ते 80 रुपये किलो तर लालबाग 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे दर आहेत. उत्पादनावर परिणाम आणि मागणी अधिकची अन् आवक कमी यामुळे आंब्याचे दर हे चढेच राहणार आहे. अक्षतृतीया संपल्यानंतर दरात घट होईल असा अंदाज आहे.

पाकिस्तानने पी. के. साहूंना भारताच्या ताब्यात सोपवलं
पाकिस्तानने पी. के. साहूंना भारताच्या ताब्यात सोपवलं.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रो-9 मार्गिकेच्या चाचणीला सुरुवात
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रो-9 मार्गिकेच्या चाचणीला सुरुवात.
अरुणाचल प्रदेशात चीनच्या कुरघोड्या सुरुच, भारतानं खडसावत थेट म्हटलं...
अरुणाचल प्रदेशात चीनच्या कुरघोड्या सुरुच, भारतानं खडसावत थेट म्हटलं....
आधी पाकला छुपा पाठिंबा, आता तुर्कस्तान म्हणतंय, चांगल्या वाईट काळात...
आधी पाकला छुपा पाठिंबा, आता तुर्कस्तान म्हणतंय, चांगल्या वाईट काळात....
तेव्हा मला अजित दादांकडून ऑफर होती, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट
तेव्हा मला अजित दादांकडून ऑफर होती, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट.
भारतानं एका झटक्यात पाकच्या चौक्या उडवल्या, व्हिडीओ पाहताच म्हणाल....
भारतानं एका झटक्यात पाकच्या चौक्या उडवल्या, व्हिडीओ पाहताच म्हणाल.....
संजय राऊतांकडून राज ठाकरे आणि नारायण राणेंचं तोंड भरून कौतुक!
संजय राऊतांकडून राज ठाकरे आणि नारायण राणेंचं तोंड भरून कौतुक!.
पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिला बनली सहाय्यक आयुक्त
पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिला बनली सहाय्यक आयुक्त.
महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई झाले देशाचे 52 वे सरन्यायाधीश
महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई झाले देशाचे 52 वे सरन्यायाधीश.
ऑपरेशन सिंदूरअंतर्गत शोपियानमध्ये राबवलेलं 'ऑपरेशन केलर' काय आहे?
ऑपरेशन सिंदूरअंतर्गत शोपियानमध्ये राबवलेलं 'ऑपरेशन केलर' काय आहे?.