AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Washim : चाढ्यावर मूठ ठेवताय, कृषितज्ञांचा सल्ला वाचा अन् निर्णय घ्या, शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

पावसाअभावी खरीप पेरण्या रखडल्या असल्या तरी ज्या शेतकऱ्यांकडे पाणीसाठा आहे अशा शेतकऱ्यांनी पिक उगवणी नंतर हलके संरक्षित ओलित करावे. तसेच उगवणीनंतर जमीनीमध्ये ओलावा टिकुन राहण्याच्या दृष्टीने व किडीचा प्रादुर्भाव कमी होण्याकरीता पिक 15 दिवसाचे झाल्यानंतर डवरणीची व इतर आंतर मशागतीची कामे करावी. त्यामुळे पाण्याचा योग्य वापर केला तर पीक उगवणीपर्यंत शेतकऱ्यांना चिंता नाही.

Washim : चाढ्यावर मूठ ठेवताय, कृषितज्ञांचा सल्ला वाचा अन् निर्णय घ्या, शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी
खरिपात सोयाबीनची पेरणी योग्य पध्दतीने केली तरच उत्पादनात वाढ होणार आहे.
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 10:15 AM

वाशिम : (Maharashtra) राज्यात पावसाने हजेरी लावली असली तरी सर्वत्र पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. असे असतानाही काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवली आहे. त्यामुळे भविष्यात (Re-Sowing) दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वीच योग्य निर्णय घेतला तर शेतकऱ्यांच्या फायद्याचे राहणार आहे. बरेच शेतकरी वळीवाचा पाऊस पडल्यावर पेरणी आटोपून घेतात मात्र पावसाने दडी मारल्यास पिक सुकण्याचे किंबहुना दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर येते. त्यामुळे अलीकडे झालेल्या पावसाने जमिनीत 4 ते 6 इंच ओलावा असल्यासच पेरणीचा निर्णय घ्यावा असे आवाहन (Agronomist) कृषितज्ञ डॉ.भरत गिते यांनी केले आहे. खरिपाबाबत यंदा शेतकऱ्यांची अडचण झाली असून सर्वकाही पावसावर अवलंबून राहणार आहे.

पाणीसाठा असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा

पावसाअभावी खरीप पेरण्या रखडल्या असल्या तरी ज्या शेतकऱ्यांकडे पाणीसाठा आहे अशा शेतकऱ्यांनी पिक उगवणी नंतर हलके संरक्षित ओलित करावे. तसेच उगवणीनंतर जमीनीमध्ये ओलावा टिकुन राहण्याच्या दृष्टीने व किडीचा प्रादुर्भाव कमी होण्याकरीता पिक 15 दिवसाचे झाल्यानंतर डवरणीची व इतर आंतर मशागतीची कामे करावी. त्यामुळे पाण्याचा योग्य वापर केला तर पीक उगवणीपर्यंत शेतकऱ्यांना चिंता नाही. मात्र, भविष्यात पावसाचे आगमन झाले तरच या पिकांना जीवदान मिळणार आहे. पेरणीयोग्य पाऊस झाला की नाही याचे मापन कसे करायचे यावर आधारित प्रात्यक्षिक डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषी संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.भरत गिते यांनी शेतकऱ्यांना करून दाखविले.

अन्यथा दुबार पेरणीचे संकट

ज्या भागामध्ये पुरेसा पेरणी योग्य पाऊस झालेला नाही अशा शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, जेणेकरुन दुबार पेरणीचे संकट येणार नाही, ८० ते १०० मीमी पाऊस पडलेला असतांना किंवा जमीनीमध्ये 4 ते 6 इंच ओलावा गेलेला असतांना किंवा जमीनीमध्ये टिचभर ते इतभर ओलावा गेलेला असतांना पेरणी करावी असे आवाहन डॉ. प्रा. भरत गिते शास्त्रज्ञ, शंकरराव तोटावार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी वाशिम यांच्यावतीने करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

खरिपाबाबत संभ्रम अवस्था

पावसामध्ये सातत्य नसल्याने यंदा खरीप हंगामाचे गणितच बिघडले आहे. आतापर्यंत पीक पेरणी होऊन शिवार हिरवेगार होणे अपेक्षित असताना राज्यात सरासरीपेक्षा निम्म्या क्षेत्रावरही पेरण्या झालेल्या नाहीत. सोयाबीन हे हंगामातील मुख्य पीक असून याचाही पेरा रखडलेला आहे. पावसावरच खरिपाचे भवितव्य ठरणार आहे .15 जुलैपर्यंत खरीप हंगामातील पेरण्या झाल्या नाहीत तर मात्र उत्पादनात घट निश्चित मानली जात आहे.

भारत - पाकिस्तान अटारी सीमेवरील दरवाजे पुन्हा उघडले
भारत - पाकिस्तान अटारी सीमेवरील दरवाजे पुन्हा उघडले.
LPG Gas : मे महिन्याच्या सुरुवातीलाच Good News... गॅस सिलिंडर स्वस्त
LPG Gas : मे महिन्याच्या सुरुवातीलाच Good News... गॅस सिलिंडर स्वस्त.
रायगडचं पालकमंत्रिपद गावगुंडाकडे नको, राऊतांचा नाव न घेता गोगावलेंना
रायगडचं पालकमंत्रिपद गावगुंडाकडे नको, राऊतांचा नाव न घेता गोगावलेंना.
चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले
चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले.
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार.
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई.
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी.
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.