AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Onion Crop : सरकार बदलले तरी कांदा दराचा वांदा मिटवणारच, कांदा उत्पादक संघटनेच्या मागण्या काय?

गेल्या चार-पाच महिन्यांपासून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना कांदा उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने विक्री करावी लागत आहे. सरकारचे कांदा दराबाबतचे धोरण ठरवलेले नाही. आतापर्यंत निर्यातीच्या धोरणावर दर राहिल असे सांगितले जात होते. मात्र, निर्यातीचे धोरण जेव्हा तसेच इतर मागण्या केंद्र सरकारकडे सुरूच राहतील राज्याने कांद्याला प्रति क्विंटल 500 रुपये देणे हे गरजेचे आहे.

Onion Crop : सरकार बदलले तरी कांदा दराचा वांदा मिटवणारच, कांदा उत्पादक संघटनेच्या मागण्या काय?
कांदा
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 5:35 PM

नाशिक : सध्या (Maharashtra) राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असल्या तरी (Onion Production) कांदा उत्पादक संघटनेला याबाबत काही देणेघेणे नाही. कारण सध्याच्या उलथापालथीमध्येही कांदा उत्पादक संघटनेने कांद्याला 500 रुपये अनुदान मिळवून देण्याची मागणी कायम ठेवली आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून कांद्याला प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान मिळवण्यासाठी राज्य सरकारकडे जोरदार पाठपुरावा केला जाईल आणि ते मिळवले जाईलच अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली आहे. त्यामुळे सरकारचा वांदा काहीही असला तरी (Onion Rate) कांद्याच्या दराचा वांदा मिटवण्याची भूमिका ही कांदा उत्पादक संघटनेची राहिलेली आहे.

कांदा उत्पादकांच्या अडचणी

गेल्या चार-पाच महिन्यांपासून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना कांदा उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने विक्री करावी लागत आहे. सरकारचे कांदा दराबाबतचे धोरण ठरवलेले नाही. आतापर्यंत निर्यातीच्या धोरणावर दर राहिल असे सांगितले जात होते. मात्र, निर्यातीचे धोरण जेव्हा तसेच इतर मागण्या केंद्र सरकारकडे सुरूच राहतील राज्याने कांद्याला प्रति क्विंटल 500 रुपये देणे हे गरजेचे आहे.गेल्या चार पाच महिन्यात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून निघावे म्हणून राज्य सरकारकडून कांद्याला तात्काळ अनुदान मिळणे गरजेचे आहे.

तसाच निर्णय होणे गरजेचे होते

महाविकास आघाडी सरकार अडचणीत असचानाच बुधवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत नियमित कर्ज अदा करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत मोठा निर्णय झाला. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्यास राज्य सरकारने सुरवात केल्याचे सांगितले. त्याच प्रमाणे कांद्याच्या अनुदनाबाबत निर्णय घेणे गरजेचे होते. मात्र, कांदा उत्पादक शेतकरी कायम अडगळीलाच राहिलेला आहे. दराच्या लहरीपणाचा फटका कांदा उत्पादकांनाच बसत असून अनुदान मिळावे हीच उत्पादक संघटनेची मागणी कायम राहणार आहे.

हे सुद्धा वाचा

कांद्याला अनुदान हेच संघटनेचे धोरण

देशात सर्वाधिक कांदा उत्पादन घेणाऱ्या महाराष्ट्रामध्ये सरकारचे कांदा उत्पादकांकडे होत असलेले दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये सरकारबद्दल प्रचंड संतापाची भावना आहे. त्यामुळे सरकारने कांदा उत्पादकांना तात्काळ अनुदान देऊन उत्पादकांचे झालेले नुकसान थांबावे यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे जोरदार पाठपुरावा केला जाणार आहे. राज्य सरकारकडून कांद्याला 500 रुपये अनुदान मिळविणारच असे ठाम भारत दिघोळे यांनी व्यक्त केले.

'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.
पाकिस्तानला पाण्याचा थेंबा-थेंबासाठी तरसवण्याची तयारी सुरू
पाकिस्तानला पाण्याचा थेंबा-थेंबासाठी तरसवण्याची तयारी सुरू.
अगर जंग छिडी तो..', मौलवींचा सवाल अन् पाकच्या नागरिकांची अजब रिअ‍ॅक्शन
अगर जंग छिडी तो..', मौलवींचा सवाल अन् पाकच्या नागरिकांची अजब रिअ‍ॅक्शन.
पाकिस्तानला तुर्कीएचा उघड पाठिंबा; कराची बंदरात युद्धनौका दाखल
पाकिस्तानला तुर्कीएचा उघड पाठिंबा; कराची बंदरात युद्धनौका दाखल.
हवाईदलाची ताकद वाढणार, HAPS खरेदी करणार; माणसाशिवाय गुप्त माहिती कळणार
हवाईदलाची ताकद वाढणार, HAPS खरेदी करणार; माणसाशिवाय गुप्त माहिती कळणार.
वैभवी देशमुखला 85.33 टक्के; वडिलांच्या आठवणीने अश्रु अनावर
वैभवी देशमुखला 85.33 टक्के; वडिलांच्या आठवणीने अश्रु अनावर.