AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded : बंद हरभरा केंद्रासमोरही शेतकऱ्यांच्या रांगा, नाफेडच्या एका निर्णयाचा हजारो शेतकऱ्यांना फटका

रब्बी हंगामातील हरभरा उत्पादनात वाढ झाल्याने खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याचे दर हे घसरले. परिणामी शेतकऱ्यांना नाफेड च्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या खरेदी केंद्राचाच आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे यंदा खरेदी केंद्रावर हरभऱ्याची विक्रमी आवक झाली. असे असतानाच मुदतीपुर्वीच खरेदी केंद्र ही बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रति क्विटलमागे शेतकऱ्यांचे 1 हजार रुपयांचे नुकसान होत आहे. कारण खुल्या बाजारपेठेत हरभरा 4 हजार 300 रुपये प्रति क्विंटल असा दर आहे तर खरेदी केंद्रावर 5 हजार 300 असा दर निश्चित झाला आहे.

Nanded : बंद हरभरा केंद्रासमोरही शेतकऱ्यांच्या रांगा, नाफेडच्या एका निर्णयाचा हजारो शेतकऱ्यांना फटका
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 1:23 PM

नांदेड : हंगामाच्या सुरवातीला (NAFED) ‘नाफेड’ने उभारलेल्या  खरेदी केंद्रावर (Chickpea Crop) हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात होते. आता 2 महिन्यानंतर चित्र बदलले गेले आहे. आता शेतकरीच हरभरा विक्रीच्या प्रतिक्षेत खरेदी केंद्राच्या दारात तासंनतास् बसून राहत आहेत. (Shopping Center) खरेदी केंद्र बंद होण्यासाठी सहा दिवसाचा आवधी असतनाच राज्यातील सर्वच केंद्र ही बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे नोंदणी केलेला हरभरा विक्री तरी करायचा कुठे असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे. 29 मे पर्यंत हरभरा खरेदी केंद्र ही सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. याकरिता अजून एक दिवसाचा आवधी असल्याने शेतकरी खरेदी केंद्राबाहेर ठाण मांडूनच आहेत.

दरात तफावत, शेतकऱ्यांचे नुकसान

रब्बी हंगामातील हरभरा उत्पादनात वाढ झाल्याने खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याचे दर हे घसरले. परिणामी शेतकऱ्यांना नाफेड च्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या खरेदी केंद्राचाच आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे यंदा खरेदी केंद्रावर हरभऱ्याची विक्रमी आवक झाली. असे असतानाच मुदतीपुर्वीच खरेदी केंद्र ही बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रति क्विटलमागे शेतकऱ्यांचे 1 हजार रुपयांचे नुकसान होत आहे. कारण खुल्या बाजारपेठेत हरभरा 4 हजार 300 रुपये प्रति क्विंटल असा दर आहे तर खरेदी केंद्रावर 5 हजार 300 असा दर निश्चित झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल वाढला असतानाच खरेदी केंद्रच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

खरेदी केंद्रासमोर वाहनांच्या रांगा

खुल्या बाजारात हरभऱ्याची विक्री केल्यावर क्विंटलमागे 1 हजार रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे उशिरा का होईना हमीभाव केंद्रावर हरभऱ्याची विक्री होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे खरेदी केंद्राला टाळे असतनाही केंद्रासमोर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. नाफेडवर हरभरा विकण्यासाठी दिवसरात्र एक करत शेतकरी खरेदी केंद्राबाहेर ठाण मांडून बसले आहेत. शिवाय नाफेडनेही मुदतीपुर्वीच खरेदी का बंद केली याबाबत स्पष्टीकरण दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमता कायम आहे.

हे सुद्धा वाचा

खरिपाची लगबग असताना कामांचा खोळंबा

सध्या शेत शिवारामध्ये खरिपपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला असून शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे ती पावसाची. पूर्व मशागतीची कामे उरकून पेरणीसाठी शेत हे तयार ठेवावे लागणार आहे. पेरणीचा हंगाम जवळ आल्याने हरभरा विकून बी-बियाण्याची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड दिसून येतंय, त्यासाठी भाड्याने वाहन आणून शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राबाहेर रांगा लागल्या आहेत. मात्र नाफेडचा काहीही निर्णय होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. नाफेडची भूमिका स्पष्ट नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झालेय.

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.