Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता नाही भासणार खताची टंचाई, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय

गेल्या काही दिवसांपासून ऐन रब्बी हंगामात खताची विशेषत: युरियाची टंचाई निर्माण झाली होती. मात्र, आता पूर्ण हंगामात खताची टंचाई भासणार नाही कारण, केंद्रीय खत मंत्रालयाने तब्बल 16 लाख टन युरियाची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता नाही भासणार खताची टंचाई, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 27, 2021 | 4:07 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ऐन रब्बी हंगामात खताची विशेषत: युरियाची टंचाई निर्माण झाली होती. मात्र, आता पूर्ण हंगामात खताची टंचाई भासणार नाही कारण, केंद्रीय खत मंत्रालयाने तब्बल 16 लाख टन युरियाची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे बांधावर राबणाऱ्या शेतकऱ्यालाही मोठा आधार मिळणार आहे. कृषी सेवा केंद्रांनी कृत्रिम टंचाई भासवून लूट सुरु केली होती त्याला आता आळा बसणार आहे.

सध्या देशात रब्बी पिकांची पेरणी शिगेला पोहोचली असून, खताची कमतरता असल्याची तक्रार विविध राज्यांतील शेतकरी करत आहेत. खते मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने हिंदू बिझनेस लाइनला सांगितले की, पश्चिम किनारपट्टीवरील बंदरात 10 लाख टन आयात केलेले खत येईल तर 6 लाख टन पूर्व किनारपट्टीवर येईल. आयात केलेले खत देशात पोहोचून देशांतर्गत बाजारपेठेच्या पुरवठ्यासाठी इंडियन पोटॅश लिमिटेडला देण्यात येणार आहे.

उत्पादनापेक्षा मागणी अधिक,

भारतात दरवर्षी 25 लाख टन युरियाचे उत्पादन होते, परंतु देशांतर्गत युरियाची मागणी उत्पादनापेक्षा जास्त आहे, ज्याची पूर्तता करण्यासाठी दरवर्षी 80 ते 90 लाख टन युरिया आयात करावा लागतो. सरकार वेळोवेळी गरज, मागणी, पुरवठा आणि किंमतींचे मूल्यांकन करून युरिया आयात करण्यास परवानगी देते. यावर्षी एप्रिल-जुलै या तीन महिन्याच्या कालावधीत चीनकडून सुमारे 10 लाख टन युरिया आयात करण्यात आला होता. देशांतर्गत गरजा लक्षात घेऊन चीनने आता निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे आता भारताला रशिया आणि इजिप्तमधून युरिया आयात करावा लागत आहे.

युरियाचा होतोय अधिक वापर

देशातील एकूण खतांच्या वापरापैकी 55 टक्के युरिया आहे. इतर खतांच्या किंमती ह्या अधिकच्या आहेत शिवाय त्यामुळे पिकांची वाढ होत नाही या कारणामुळे शेतकरी युरिया वापरणेच पसंत करतात. युरियाच्या 45 किलोच्या बॅगची कमाल किरकोळ बाजारात 242 असून 50 किलो बॅगची किंमत 268 रुपये आहे तर डीएपीच्या 50 किलो बॅगची किंमत 1200 रुपये आहे.

मागणी आणि झालेला पुरवठा

खत मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार एप्रिल-सप्टेंबर दरम्यान खरीप पेरणी हंगामासाठी युरियाची आवश्यकता 17 लाख 75 हजार टन एवढी होती तर उपलब्धता 20 लाख 82 हजार टन आणि 16 लाख 56 हजार टन होती. सध्याच्या रब्बी पेरणी हंगामाची मागणी अंदाजे 17 लाख 9 हजार टन आहे, तर २४ नोव्हेंबर रोजी उपलब्धता 5 लाख 44 हजार टन एवढी होती. याच रब्बी हंगामात 1 ऑक्टोबरपासून 4 लाख 41 हजार टन युरियाची विक्री झाली आहे. अशा परिस्थितीत आता या हंगामासाठी शेतकऱ्यांना केवळ 80 लाख टन युरिया उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

सोयाबीनच्या दर वाढणारच शेतकऱ्यांनी केवळ ‘या’ गोष्टींचे पालन करावे, शेतकऱ्यांना कृषितज्ञांचा काय आहे सल्ला?

तुम्हाला माहिती आहे का झाडे अचानक का सुकतात? हवामान बदलाचा परिणाम की अणखीन काही…!

विज तोडणीवरुन मनसे आक्रमक, तर अधिकाऱ्यांना झाडाला बांधूनच..!

वरळीत लागले सावंतांच्या विरोधात बॅनर
वरळीत लागले सावंतांच्या विरोधात बॅनर.
संतापजनक! पोलीस दलात असलेल्या कर्मचाऱ्यनेच टाकला ड्रग्सचा कारखाना
संतापजनक! पोलीस दलात असलेल्या कर्मचाऱ्यनेच टाकला ड्रग्सचा कारखाना.
ट्रम्प यांचा यू टर्न, टेरिफला 90 दिवसांची स्थगिती
ट्रम्प यांचा यू टर्न, टेरिफला 90 दिवसांची स्थगिती.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी.
मनसेच्या भानुशाली यांचा सुनील शुक्लांना फोन; कॉन्फरन्स कॉलवर पोलीसही
मनसेच्या भानुशाली यांचा सुनील शुक्लांना फोन; कॉन्फरन्स कॉलवर पोलीसही.
थरार! चेंबुरमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार
थरार! चेंबुरमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार.
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय.
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख.
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा.
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर.