AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कृषी पंपावरुन रणकंदन : राज्य सरकारच्या सुल्तानी कारभारामुळेच ‘सुरज’ सारख्या शेतकऱ्याचा अस्त

रब्बी हंगामातील पिके जोमात असतानाच कृषी पंपाचा विद्युत पुरवठा हा खंडीत केला जात आहे. शिवाय थकबाकीपोटी सक्तीची वीजबिल वसुलीही केली जात असल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट ओढावले आहे. दरवर्षी उत्पादनात घट, वाढते कर्ज आणि यंदा पाणी असूनही केवळ कृषीपंपामुळे पिकांना देता येईना यामुळे पंढरपूर तालुक्यातील सुरज जाधव या तरुण शेतकऱ्याने ‘पुन्हा कधी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येणार नाही.अस म्हणत व्हिडीओ करुन विष प्राशन करुन आत्महत्या केली होती.

कृषी पंपावरुन रणकंदन : राज्य सरकारच्या सुल्तानी कारभारामुळेच 'सुरज' सारख्या शेतकऱ्याचा अस्त
कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत केल्यावरुन विधान सभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 1:11 PM

मुंबई : रब्बी हंगामातील पिके जोमात असतानाच (Agricultural Pump) कृषी पंपाचा विद्युत पुरवठा हा खंडीत केला जात आहे. शिवाय (Arrears) थकबाकीपोटी सक्तीची वीजबिल वसुलीही केली जात असल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट ओढावले आहे. दरवर्षी उत्पादनात घट, वाढते कर्ज आणि यंदा पाणी असूनही केवळ कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत केल्याने पिकांना देता येईना यामुळे पंढरपूर तालुक्यातील सुरज जाधव या तरुण शेतकऱ्याने ‘पुन्हा कधी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येणार नाही.अस म्हणत व्हिडीओ करुन विष प्राशन करुन आत्महत्या केली होती. याचे पडसाद आता राज्य विधीमंडळाच्या (At the convention) अधिवेशनात उमटत आहे. आतापर्यंत निसर्गाच्या लहरीपणाचा सामना आणि आता हे सुल्तानी संकट यामुळेच राज्यातील शेतकरी आत्महत्या संख्या वाढत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. एवढेच नाही तर सुरज जाधव च्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून किमान आता तरी कृषीपंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

सरकारमुळेच शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ

राज्य सरकारच्या धोरणामुळेच सुरज जाधव सारख्या तरुण शेतकऱ्यावर ही वेळ येत आहे. सरकारकडून शेतकरी हीताच्या गोष्टी अपेक्षित आहेत. मात्र, ठाकरे सरकारला नेमके झाले तरी काय? गेल्या दोन वर्षात अस्मानी संकट आणि यंदा सुल्तानी संकट यामुळे जणूकाही सरकारच हे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत असल्याचे चित्र सध्या राज्यात सुरु आहे. तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेली पीके ही करपून जात आहेत. रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण असताना सरकारच अडचणी निर्माण करीत आहे. ठाकरे सरकारला नेमके झाले तरी काय असा सवाल यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला होता.

मंत्र्यांमध्ये अवमेळ, फटका शेतकऱ्यांना

गतवर्षीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकाही कृषीपंपाची वीज कापली जाणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, ठाकरे सरकामध्ये अवमेळ आहे. आता उर्जामंत्री हे विद्युत पुरवठा खंडीत केला जाणार असल्याचे ठणकावून सांगत आहे. सरकारच्या या धोरणांचाच फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने सरकारने पूर्ण केलेली नाहीत.

तरुणाकडून विष प्राशन करताना व्हिडीओ रेकॉर्ड!

विष प्राशन करताना या तरुणाने रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओत सरकारविरोधात नाराजी व्यक्त केलीय. ‘पुन्हा कधी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येणार नाही. आपलं आयुष्य इथपर्यंतच होतं. शेतकरी नामर्द आहे. शेतकऱ्याच्या जन्माला आपण कधीच येणार नाही. सरकारसुद्धा शेतकऱ्याच्या नादी लागत नाही. शेतकऱ्याचा कधीही विचार करणारं नाही हे सरकार. जोपर्यंत शेतकरी आहे तोपर्यंत सरकार नाही’, असं म्हणत सुरजने विष प्राशन केलं.

संबंधित बातम्या :

Grape : सर्वकाही व्यर्थ, हंगामाच्या अंतिम टप्प्यात उत्पादनही घटले अन्…

Photo Gallery: अहो खरंच का… गायीच्या पोटी जुळ्या वासरांची जोडी, गाव म्हणतंय मारुतीरायाच्या सेवेचा प्रसाद!

शेतकरीच लावणार अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी, जिल्हानिहाय काय होत आहे निर्णय? वाचा सविस्तर

पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.