AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Orchard : प्रतिकूल परस्थितीमध्येही आंबा लागवडीलाच प्राधान्य, योजनेचा लाभ घेऊन पीक पध्दतीमध्ये बदल

यंदाच नाही तर गेल्या 4 वर्षापासून वातावरणातील बदलामुळे फळबागा ह्या धोक्यात आहेत. चालू हंगामात आंब्याचे केवळ 10 टक्के उत्पादान शेतकऱ्यांच्या पदरी पडले आहे. असे असताना पुन्हा शेतकरी हे फळबाग लागवडीमध्ये आंब्यालाच प्राधान्य देत आहेत. माहे एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यानच्या काळात फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा लाभ घेता येतो.

Orchard : प्रतिकूल परस्थितीमध्येही आंबा लागवडीलाच प्राधान्य, योजनेचा लाभ घेऊन पीक पध्दतीमध्ये बदल
यंदाच्या वर्षात फळबागमध्ये आंबा लागवडीलाच प्राधान्य दिले जात आहे.
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 5:11 AM

पुणे : यंदाच नाही तर गेल्या 4 वर्षापासून (Climate Change) वातावरणातील बदलामुळे (Orchard) फळबागा ह्या धोक्यात आहेत. चालू हंगामात आंब्याचे केवळ 10 टक्के उत्पादान शेतकऱ्यांच्या पदरी पडले आहे. असे असताना पुन्हा शेतकरी हे फळबाग लागवडीमध्ये (Mango) आंब्यालाच प्राधान्य देत आहेत. माहे एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यानच्या काळात फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा लाभ घेता येतो. त्याअनुंशाने शेतकऱ्यांनी आंबा लागवडीवर भर दिला आहे. राज्यात आतापर्यंत 42 हजार 350 हेक्टरापैकी 20 हजार 249 हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड केली गेली आहे तर 4 हजार 700 हेक्टरावर संत्रा लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

फळबाग क्षेत्र वाढवण्यासाठी कृषी विभागाचा पुढाकार

फळबागाचे क्षेत्र वाढवण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केल आहे. शिवाय फळबाग लागवडीला शेतकरीही प्राधान्य देत आहेत. गेल्या 38 हजार हेक्टरावर फळलागवड आणि यंदा मार्चपर्यंत 60 हजार 50 हेक्टरावर लागवडीचे नियोजन करण्यात आले होते. आतापर्यंत 42 हजार 350 हेक्टरावर लागवड झाली आहे. निसर्गाचा लहरीपणा असला तरी फळबागेतूनच उत्पादनाची हमी शेतकऱ्यांना वाटत असल्याने फळबाग क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे.

अनुदान लाभासाठी 1 लाखाहून अधिक शेतकऱ्यांचे अर्ज

फळबाग लागवडीसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून अनुदान दिले जाते. अनुदान पदरी पडावे म्हणून तब्बल 1 लाख 8 हजार 273 शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अर्ज केले आहेत. शिवाय फळबागांचा प्रयोग हा कोरडवाहू क्षेत्रावरच अधिक करण्यात आला आहे. पाण्याची सोय आणि तंत्रशुध्द पध्दतीने उत्पादन वाढवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. यामध्ये अहमदनगर, सोलापूर, सातारा हे जिल्हे आघाडीवर आहेत. शिवाय सीताफळाला डावलून शेतकऱ्यांचा भर हा आंब्यावरच आहे.

असे आहे योजनेतील अनुदानाचे स्वरुप

*महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड करणारे लाभार्थी हे बहुतांशी जॉबकार्डधारक असतात. त्यामुळे त्यांनी केलेल्या फळबाग लागवडीचे संवर्धन ही त्यांची जबाबदारी राहते. *वृक्षनिहाय मंजूर मापदंडानूसार दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील जिवंत झाडांच्या टक्केवारी प्रमाणे कामे करण्याची जबाबदारी लाभार्थ्यांची राहिल. *दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी वृक्ष फळपिकांच्या बाबतीत 75 टक्के झाडे जिवंत ठेवतील अशाच लाभार्थ्यांनाच दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान दिले जाते. मजुरी दरात सुधारणा करुन आता रु.201 इतके मजुरी दर लागु करण्यात आला असुन त्यानुसार फळपिकनिहाय सुधारित खर्चाचे मापदंड तयार करण्यात येत आहेत.

संबंधित बातम्या :

Lasalgaon Onion: 2 दिवसांमध्येच ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर प्रश्नचिन्ह, कांदा उत्पादक संघटनेची नेमकी भूमिका काय?

Latur Market : सोयाबीनचे स्थिरच, हरभऱ्याच्या दरवाढीमागे कारण काय? शेतकऱ्यांची सावध भूमिका

Agricultural Department : खरिपाच्या नियोजन बैठकांमध्येही ‘पिन होल बोरर’वरच चर्चा, डाळिंब बागा जोपासण्याचे आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक.
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य.
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं.
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?.
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड.
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र.
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?.
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?.
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण.