AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या जिल्ह्यात बेकायदेशीर बोगस खते आणि बोगस बियाणे याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष

मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे होऊन देखील अजूनही अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही, त्यामुळे आता झालेले आणि मागचे असे संयुक्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी आता शेतकरी करीत आहे.

या जिल्ह्यात बेकायदेशीर बोगस खते आणि बोगस बियाणे याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष
nandurbar news in marathiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 3:16 PM

जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात ४ जून रोजी आलेल्या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान (banana crop damage) झाले आहे. त्याचा सर्वाधिक फटका केळी पिकाला बसला आहे. जिल्ह्यात पाच हजार एकर क्षेत्रावरील नुकसान झाल्याचा अंदाज कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात असून कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकांच्याद्वारे पंचनामे करण्यात येत आहेत. मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचे (unseasonal rain) पंचनामे होऊन देखील अजूनही अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही, त्यामुळे आता झालेले आणि मागचे असे संयुक्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी आता शेतकरी करीत आहे.

शेती सोबतच धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने लवकरात लवकर मदत द्यावी. तर जिल्ह्यातील पंचनाम्यांचे काम अंतिम टप्प्यात असून पंचनामे पूर्ण झाल्यावर पूर्ण नुकसानीचा अहवाल सादर होणार असल्याची माहिती कृषी आणि महसूल विभागाच्या वतीने देण्यात आली आहे अशी माहिती वनसिंग खर्डे सहाय्यक कृषी अधिकारी शहादा यांनी सांगितली.

हे सुद्धा वाचा

नंदुरबार जिल्ह्यात बेकायदेशीर बोगस खते आणि बोगस बियाणे विक्री होत आहेत. परंतु कृषी विभाग या काळात दुर्लक्ष करत असून बोगस बियाणं खतं विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत नसल्याने कृषी विभाग यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून एकदिवसीय धरणा आंदोलन केलं आहे. नंदुरबार जिल्ह्यात गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणावर खत आणि बियाणे येत आहे, परंतु कृषी विभाग संबंधित कृषी सेवा केंद्र व विक्री होणारे लोकांवर कारवाई करताना दिसत नाही. यासाठी ठाकरे गटाने कृषी विभागाला तक्रार करून देखील दुर्लक्ष करत असल्याने आज ठाकरे गटाच्या वतीने नंदुरबार जिल्हा कृषी कार्यालयाच्याबाहेर बियाणं आणि खतांच्या बॅग घेऊन संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध आंदोलन केलं होतं.

तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी
तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी.
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप.
आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?
आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?.
भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध अमेरिकेनं टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान
भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध अमेरिकेनं टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान.
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?.
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट.
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज.
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन.
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही.