AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांद्याला 30 रुपयांचा दर द्या, शेतकऱ्यांचं ‘आमचा कांदा आमचा दर’ आंदोलन सुरु

कांद्याचे दर कमी झाल्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एक आंदोलन सुरु केलं आहे. onion price today lasalgaon

कांद्याला 30 रुपयांचा दर द्या, शेतकऱ्यांचं 'आमचा कांदा आमचा दर' आंदोलन सुरु
कांदा
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 10:42 AM

मुंबई : कांद्याचे दर कमी झाल्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एक आंदोलन सुरु केलं आहे. ‘आमचा कांदा आमचा दर’ या आंदोलनाचं नाव आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव या बाजारसमितीमध्ये सुरुवात झाली आहे. कांद्याचे दर शेतकऱ्यांनी ठरवावे, याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी कांदा उत्पाकांकडून हे आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. सध्या कांद्याचे दर बाजारातील परिस्थितीत ठरवले जातात. शेतकरी ज्यावेळी कांद्याचं उत्पादन घेतात त्यावेळी 1 किलोचे दर 5-7 रुपयांपर्यंत खाली येतात. व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी केल्यानंतर चार पाच महिन्यांनतर तेच दर 100 ते 150 रुपयांपर्यंत पोहोचतात. यामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांना नुकसान सोसावं लागतं. (onion price today lasalgaon onion farmers started movement to fix know msp for all farmers )

कांद्याला 30 रुपये किलो दर मिळावा

महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी, “देश स्वातंत्र्याचं 75 वं वर्ष साजरं करत आहे मात्र, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा दर ठरवण्याचा अधिकार मिळालेला नाही.”, असं म्हटलं आहे. सरकारनं कांद्याबाबत कोणतेही धोरण ठरवलेलं नाही. गावागावांमध्ये जाऊन कांद्याची विक्री किमान आधारभूत किमतीवर व्हावी म्हणून शेतकऱ्यांमध्ये जागरुकता व्हावी म्हणून पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती, भारत दिघोळे यांनी दिली. कांद्याला 30 रुपये किलो दर मिळावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली.

शेतकरी कांदा साठवू का शकत नाही?

आर्थिक समस्येमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा बाजारसमितीमध्ये लगेचच विकावा लागतो. कांदा साठवण्याची व्यवस्था कमी प्रमाणात असल्यानं कांदा उत्पादकांसमोर अडचणी निर्माण होतात. भारत दिघोळे यांनी एका गावामध्ये 100 शेतकरी असल्यास 10 शेतकऱ्यांकडेच कांदा साठवण्याची व्यवस्था आहे. सरकारकडून कांदा उत्पादकांना चाळ बनवण्यासाठी मदत दिली जाते. ही मदत फारच तोकडी असल्याचे भारत दिघोळे यांनी सांगतिलं. 25 टन कांदा साठवण्यासाठी चाळ बनवायची असल्यास 4 लाख रुपये लागतात. सरकार फक्त 87 हजार 500 रुपये देते, असं दिघोळे म्हणाले. एका तालुक्यात 2 हजार शेतकऱ्यांनी सरकारी अनुदानासाठी अर्ज केल्यास 100 शेतकऱ्यांना लाभ होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा कमी किमतीत विकावा लागतो.

कांदा उत्पादनासाठी खर्च किती?

भारत दिघोळे यांनी नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड 2017 च्या अहवालानुसार एक किलो कांदा उत्पादनासाठी 9.34 रुपये खर्च येतो, असं सांगितलं. तर चार वर्षात हा खर्च आता 15 रुपयांवर पोहोचला आहे. महाराष्ट्रात नाशिक, धुळे, अहमदनगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याचं उत्पादन होतं.

संबंधित बातम्या:

टोमॅटो झाला, आता वांग्यालाही कवडीमोल भाव, उद्विग्न शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल

कोरोनाचा फटका द्राक्ष उत्पादकांना झटका, निर्यातीवरील सबसिडी सुरु करण्याची केंद्राकडे हाक

(onion price today lasalgaon onion farmers started movement to fix know msp for all farmers )

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.