Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळी पावसानं कांदा शेतात सडला, उत्पादकांना कर्ज फेडण्याची चिंता, पंचनामा करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

भंडारा जिल्ह्यातील बहुतांश: भागात भात पिकाची शेती केली जाते. मात्र, पवनी तालुक्यातील चौरास भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिचाळ परिसरात पारंपरिक भात पिकाऐवजी कांद्याच मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणारे सुध्दा शेतकरी आहेत.

अवकाळी पावसानं कांदा शेतात सडला, उत्पादकांना कर्ज फेडण्याची चिंता, पंचनामा करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
Onion farmersImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 1:22 PM

भंडारा : मागील आठवडाभरापासून भंडारा (Bhandara) जिल्ह्यात अवकाळी पावसानं (unseasonal rain) जोरदार हजेरी लावलेली आहे. यामुळं धान उत्पादक शेतकरी असो किंवा पालेभाजी वा बागायती शेती करणारे शेतकरी, निसर्गाच्या दुष्टचक्रात सर्वच सापडले आहेत. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion farmers) अक्षरशः हवालदिल झाले असून बांधातचं कांदा सडायला लागला तरी, प्रशासनाचे अधिकारी पंचनामा करण्यासाठी शेत बांधावर फिरकले नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. वारंवार अवकाळी पाऊस होत असल्यामुळे शेतकरी वर्ग अधिक चिंतेत आहे.

भंडारा जिल्ह्यातील बहुतांश: भागात भात पिकाची शेती केली जाते. मात्र, पवनी तालुक्यातील चौरास भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिचाळ परिसरात पारंपरिक भात पिकाऐवजी कांद्याच मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणारे सुध्दा शेतकरी आहेत. किंबहुना कांदा शेतीतून अनेकांनी स्वतःची मोठी आर्थिक भरारी घेतली आहे. या वर्षी सुमारे 60 हेक्टर पेक्षा अधिक भागात कांद्याची लागवड केली असून आता कांद्याची काढण्याचा हंगाम सुरू असताना सतत कोसळणाऱ्या अवकाळी आणि गारपिटीसह पावसानं उसंत घेतली नाही अशी माहिती तरुण शेतकरी, चिराग काटेखाये यांनी दिली.

अवकाळी पावसात विक्रीयोग्य कांदा शेत बांधावर पावसात सापडला आणि आता अक्षरशः सडायला लागला आहे. 48 तासांपेक्षा अधिक कालावधी लोटलेला असतानाही प्रशासनाचा कुठलाही अधिकारी किंवा कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी पोहचलेला नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्याशी वारंवार संपर्क साधून नुकसानीचा पंचनामा करण्याची विनवणी केली असता त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे रवी खटारे, कांदा उत्पादक शेतकरी यांनी रोष व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

नांदेडमध्ये रात्री उशीरा सुरू झालेल्या अवकाळी पावसाने पहाटे चार वाजेपर्यंत झोडपून काढल आहे. रात्रभर कोसळलेल्या या पावसाने नांदेडचे कमाल तापमान चोवीस अंशावर घसरल आहे. त्यामुळे वातावरणात गारठा तयार झालाय, सातत्याने बरसणाऱ्या या अवकाळी पावसामुळे नांदेडमध्ये साथीच्या आजारात देखील वाढ झाली आहे.

बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला.
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं.