Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indapur : काही तासांपूर्वी घेतलेल्या 54 शेळ्या डोळ्यादेखत दगावल्या, शेतकऱ्यावर हे काय आभाळ कोसळलं?

पारंपरिक शेतीमध्ये केवळ कष्ट आणि कष्टच आहे त्यामुळे नितीन आणि अतुल याने काहीतरी नवीन करुन दाखवण्याचा निर्धार केला होता. यासाठी त्यांनी अथक परीश्रम तर घेतलेच पण पाण्यासारखा पैसा खर्ची करुन शेळीपालनाला सुरवात केली होती. एका शेळीपासून केलेली सुरवात आता 54 संख्येवर पोहचली होती. पण अवघ्या काही वेळात सर्वच्या सर्व शेळ्या दगावणे यापेक्षा वेगळे दु:ख ते काय?

Indapur : काही तासांपूर्वी घेतलेल्या 54 शेळ्या डोळ्यादेखत दगावल्या, शेतकऱ्यावर हे काय आभाळ कोसळलं?
इंदापूर येथे अवघ्या काही तासांमध्ये 54 शेळ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 11:52 AM

इंदापूर : शेती व्यवसायात नवीन काहीतरी करुन दाखवण्याच्या जिद्दीने तरुण शेतकरी वेगवेगळे प्रयोग करतात. यामधून कुणाची यशोगाथा होते तर कुणाच्या पदरी निराशा. असाच प्रकार (Indapur) इंदापुरातील 2 युवकांसोबत घडला आहे. (Traditional farming) पारंपरिक शेती न करता अधिकच्या उत्पन्नासाठी येथील नितीन पांढरे व अतुल घोडके या दोघांनी गेल्या अनेक महिन्यांपासून (Sheep rearing) शेळी पालन व्यवसाय उभारला होता. जिल्हाभरातील जनावरांचे आठवडी बाजार पालथे घालून शेळ्यांची आणि बोकडाची खरेदी करीत होते.अशा पध्दतीने त्यांनी 54 शेळ्या आणि बोकडाची खरेदी झाली होती. मात्र रविवारी अवघ्या 1 तासाच्या आतमध्येच या शेळ्या दगावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे नितीन आणि अतुलच्या पायाखालची मातीच सरकली. काही लक्षात येण्यापूर्वीच एका माघून एक अशा शेळ्या दगावल्या आहेत. त्यामुळे त्यांची मेहनत आणि स्वप्न सर्वकाही धुळीस मिळाले असेच झाले आहे.

शुन्यातू केली होती सुरवात, शेवटही शून्यातच

पारंपरिक शेतीमध्ये केवळ कष्ट आणि कष्टच आहे त्यामुळे नितीन आणि अतुल याने काहीतरी नवीन करुन दाखवण्याचा निर्धार केला होता. यासाठी त्यांनी अथक परीश्रम तर घेतलेच पण पाण्यासारखा पैसा खर्ची करुन शेळीपालनाला सुरवात केली होती. एका शेळीपासून केलेली सुरवात आता 54 संख्येवर पोहचली होती. पण अवघ्या काही वेळात सर्वच्या सर्व शेळ्या दगावणे यापेक्षा वेगळे दुख ते काय?

4 शेळ्यांचे शवविच्छेदन, पशुवैद्यकीय अधिकारीही घटनास्थळी

अचानकच 54 शेळ्या दगावल्याने कुणाच्याच काही लक्षात आले नाही की नेमका प्रकार काय आहे तो. या घटनेची माहिती पशूवैद्यकी अधिकारी यांना देताच अवघ्या काही वेळेत हजरही झाली. त्यांनी प्राथमिक तपासणी करुन चार शेळ्यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पुणे येथील प्रयोगशाळेत नमुने पाठवून देण्यात आले आहेत. नेमका हा प्रकार कशामुळे घडला याबाबत सध्या तरी सर्वजण अनभिज्ञच आहेत.

अहवालानंतरच चित्र स्पष्ट

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन करत यासंदर्भात सविस्तर माहिती दिली पशुवैद्यकीय अधिकारी या गंभीर घटनेची दखल घेऊन तात्काळ घटनास्थळी गेले व तेथील चार शेळ्यांचे शवविच्छेदन करून पुणे येथील प्रयोगशाळेत नमुने पाठवून देण्यात आले आहेत. आता येथील अहवालावरच सर्वकाही अवलंबून आहे. अचानक सर्वच शेळ्यांचा मृत्यू झाल्याने विषबाधा की अन्य काही याचा तपास आता अहवालानंतरच लागेल.

साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी.
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण.
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप.
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा.
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?.