AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Onion: बाजारपेठेत दराचा वांदा, काढणी खर्च वाढल्याने कांदा वावरातच सडला

दिवसेंदिवस कांदा उत्पादनावरील खर्च हा वाढतच आहे.बियाणे, लागवड, खते, कीटकनाशके आणि आता मजुरी यामध्येही वाढ झाली आहे. उत्पादनावरील खर्च आणि प्रत्यक्ष उत्पन्न याचा ताळमेळच लागत नसल्याने या नगदी पिकाबाबत शेतकऱ्यांची भूमिका ही बदलत जात आहे. 2019 तुलनेत काढणी खर्चात दुपटीने वाढ झाली आहे. तर दुसरीकडे कांदा दराचा लहरीपणा हा कायम आहे.

Onion: बाजारपेठेत दराचा वांदा, काढणी खर्च वाढल्याने कांदा वावरातच सडला
उन्हाळी हंगामातील कांद्याच्या दरात मोठी घसऱण झाली आहे. काढणीचाही खर्च परवडत नाही असे चित्र नाशिक जिल्ह्यामध्ये आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 6:15 AM

नाशिक : यंदा  (Summer Onion)उन्हाळी कांद्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. गेल्या काही दिवसांपासून (Onion Rate) कांद्याच्या दरात अशी काय घसरण होत आहे की बाजारपेठेत दाखल करण्यासाठी होणारा खर्चही उत्पादनातून शेतकऱ्यांच्या पदरी पडलेला नाही. तर दुसरीकडे (Onion Harvesting) कांदा काढणीसाठी मजूरांची टंचाई भासत असल्याने कांदा पीक सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. वाढते ऊन आणि शेतीकामामुळे मजूर तर मिळतच नाहीत आणि मिळाले तरी मजुरीमध्ये होत असलेल्या वाढीमुळे कांदा वावरातून बाहेर काढणेही मुश्किल होत आहे. दरवर्षी दरातील लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत असतो पण यंदा दुहेरी संकट ओढावल्याने कांदा पीक कसे लहरीपणाचे आहे याचा प्रत्यय शेतकऱ्यांना येऊ लागला आहे.कांदा काढणीच्या दरात गतवर्षीपेक्षा 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

खर्च वाढला अन् दराच्या लहरीपणाचा फटका बसला

दिवसेंदिवस कांदा उत्पादनावरील खर्च हा वाढतच आहे.बियाणे, लागवड, खते, कीटकनाशके आणि आता मजुरी यामध्येही वाढ झाली आहे. उत्पादनावरील खर्च आणि प्रत्यक्ष उत्पन्न याचा ताळमेळच लागत नसल्याने या नगदी पिकाबाबत शेतकऱ्यांची भूमिका ही बदलत जात आहे. 2019 तुलनेत काढणी खर्चात दुपटीने वाढ झाली आहे. तर दुसरीकडे कांदा दराचा लहरीपणा हा कायम आहे. जानेवारी महिन्यात 35 रुपये किलो असलेला कांदा आता 1 रुपया किलोने विक्री करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे. रोजंदारीने नाही तर गुत्ते या पध्दतीने काढणी कामे केली जात आहे. शेतकऱ्यांना पीक काढणीशिवाय पर्यायच नसल्याने अधिकचे मजुरी देऊन कांदा काढणीची कामे सुरु आहेत.

तरीही कांद्यालाच पसंती..

दरवर्षी कांद्याच्या दरात चढ-उतार हा ठरलेलाच आहे. असे असतानाही कांद्याचे क्षेत्र वाढतेय हे विशेष. एक वर्ष नुकसान झाले तरी आगामी वर्षात दर मिळतील या आशेने राज्यात कांद्याचे क्षेत्र वाढत आहे. शिवाय नाशिक, सोलापूर, मालेगाव या मुख्य बाजारपेठांच्या भागात तर विक्रमी क्षेत्रावर कांदा लागवड केली जाते. लागवडीच्या दरम्यान, दरातील चढ-उताराचा अंदाजच येत नाही. त्यामुळे या सर्व बाबींचा विाचर करुन कांद्याला किमान 30 रुपये किलो दर ठरविण्याची मागणी शेतकरी आणि कांदा उत्पादक संघटना ह्या करीत आहे.

हे सुद्धा वाचा

उत्पादन खर्च वाढला, भावही वाढावा

कांदा हे हंगामी पीक आहे. शिवाय दराला घेऊन यातील तेजी-मंदीचा परिणाम थेट उत्पादकावर होत आहे. वाढीव दराचा कमी पण ढासळलेल्या दराने अधिकचे नुकसान हे ठरलेलेच आहे. दिवसेंदिवस उत्पादनात खर्च वाढत आहे याचा विचार करुन शासनानेही दर निश्चित करावा अशी मागणी शेतकरी गणेश शेटे यांनी केली आहे. नगदी पिकांची ही अवस्था तर इतर पिकांचे काय असा सवालही शेतकरी उपस्थित करीत आहेत.

तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी.
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार.
आयएमएफकडून मिळालेल्या पैशातून पाकिस्तान टेरर फंडिंग करतो - राजनाथ सिंह
आयएमएफकडून मिळालेल्या पैशातून पाकिस्तान टेरर फंडिंग करतो - राजनाथ सिंह.
राऊतांच्या पुस्तकावर विचारताच फडणवीस म्हणाले, माझं वय बालवाङ्मय...
राऊतांच्या पुस्तकावर विचारताच फडणवीस म्हणाले, माझं वय बालवाङ्मय....
ट्रम्पच्या हत्येच्या कट... ज्याच्यावर संशय तो म्हणतो कल्पनाच नव्हती की
ट्रम्पच्या हत्येच्या कट... ज्याच्यावर संशय तो म्हणतो कल्पनाच नव्हती की.
लालपरीच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, एसटी बस आता स्मार्ट होणार
लालपरीच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, एसटी बस आता स्मार्ट होणार.
ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शिरलं पाणी; रस्त्यांना आलं तलावाचं स्वरूप
ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शिरलं पाणी; रस्त्यांना आलं तलावाचं स्वरूप.
हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर, काय झाली चर्चा?
हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर, काय झाली चर्चा?.
नरकातला स्वर्ग नाही तर गटारातील... राऊतांवर चित्रा वाघ यांचा निशाणा
नरकातला स्वर्ग नाही तर गटारातील... राऊतांवर चित्रा वाघ यांचा निशाणा.
लष्करी सराव केला, क्षेपणास्त्र पुरवले; भारत-पाक तणावात चीनची भूमिका?
लष्करी सराव केला, क्षेपणास्त्र पुरवले; भारत-पाक तणावात चीनची भूमिका?.