AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharif Season : नांदेडच्या शेतकऱ्यांचे ‘टायमिंग’ हुकले, पावसाची उघडीप तरीही चाढ्यावर मूठ, कोणता संभाव्य धोका?

आतापर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत मराठवाड्यात केवळ 6.38 टक्के पाऊस झाला आहे. यामध्ये औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली असली तरी तो पेरणी योग्य पाऊस नाही. मात्र, खरिपातील सोयाबीन, तूर आणि मूग हे कमी पाण्यावरही तरली जाणारी पिके आहेत. त्यामुळे देगलूर भागातील शेतकऱ्यांनी कोणताही विचार न करता सोयाबीन, तूर आणि मुगाची पेरणी केली आहे.

Kharif Season : नांदेडच्या शेतकऱ्यांचे 'टायमिंग' हुकले, पावसाची उघडीप तरीही चाढ्यावर मूठ, कोणता संभाव्य धोका?
नांदेड जिल्ह्यातील देगलूर भागात अपेक्षित पाऊस नसतानाही पेरणीला सुरवात झाली आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 10:43 AM

नांदेड : कृषी विभागासह राज्याच्या कृषी मंत्र्यांनी वेळोवेळी आवाहन केले आहे की, (Kharif Sowing) पेरणी योग्य पाऊस झाल्याशिवाय बियाणे जमिनीत गाढू नका म्हणून असे असताना (Nanded Farmer) नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात पेरण्या झाल्या आहेत. खरिपाची पेरणी करावी धावून अशी म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. पण त्यासाठी पुरेशा प्रमाणात पाऊस होणही गरजेचे आहे. जिल्ह्यातील देगलूर भागात थोड्याबहुत प्रमाणात झालेल्या पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, मुगाचा पेरा केला आहे. पणा (Rain) पावसाची अशीच उघडीप राहिली तर या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते शिवाय केलेला खर्च वाया जाण्याची भीती आता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. देगलूरसह इतर भागातही शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवण्याचे धाडस केले आहे.

अत्यल्प पावसावर तीन पिकांचा पेरा

आतापर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत मराठवाड्यात केवळ 6.38 टक्के पाऊस झाला आहे. यामध्ये औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली असली तरी तो पेरणी योग्य पाऊस नाही. मात्र, खरिपातील सोयाबीन, तूर आणि मूग हे कमी पाण्यावरही तरली जाणारी पिके आहेत. त्यामुळे देगलूर भागातील शेतकऱ्यांनी कोणताही विचार न करता सोयाबीन, तूर आणि मुगाची पेरणी केली आहे. आता पुरेशा प्रमाणात जमिनीत ओल असेल पिकांची उगवण होईल पण त्यानंतरच्या वाढीसाठी पावसाचीच आवश्यकता असते.

कृषी विभागाचे काय आहे आवाहन?

यंदा पावसाने उशीर केला असला तरी पेरण्या लांबणीवर पडल्या तरी त्याचा उत्पादनावर परिणाम होणार नाही. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. असे असले तरी 75 ते 100 मिमी पावसाची नोंद झाल्याशिवाय पेरणी करणे हे धोक्याचे आहे. यामुळे पीक जोमात वाढत तर नाहीच पण उत्पादनावरही त्याचा परिणाम होतो. आता पिकांची उगवण झाली आणि वाढच झाली नाहीतर पुन्हा दुबार पेरणी ही ठरलेलीच आहे. त्यामुळे अधिकचा खर्च आणि अधिकचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेट अॅण्ड वॉच ची भूमिका घेणे गरजेचे आहे.

हे सुद्धा वाचा

पेरणीमुळे नेमके नुकसान काय ?

खरीप हंगामातील पिके ही पावसावरच अवलंबून असतात. त्यामुळे पुरेशी ओल नसतानाही पेरणीचे धाडस केले तर पिकांची वाढ खुंटणार आहे. शिवाय ही पिके अल्पावधीची असतात. त्यामुळे प्रत्येक घटकाचा त्याच्यावर परिणाम हा होतोच. पावसाने अजून ओढ दिली तर एकरी 4 ते 5 हजाराचा खर्च करुन दुबार पेरणी करावीच लागणार आहे. त्यामुळे नांदेडच्या शेतकऱ्यांनी केलेली चूक इतरांनी करु नये एवढेच.

भारतात उद्या युद्धाचा सायरन वाजणार, आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष
भारतात उद्या युद्धाचा सायरन वाजणार, आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष.
आमच्या हाती काय बंदुका देणार? मॉक ड्रिलवरून राऊतांचा सरकारला खोचक सवाल
आमच्या हाती काय बंदुका देणार? मॉक ड्रिलवरून राऊतांचा सरकारला खोचक सवाल.
देशव्यापी मॉक ड्रिल, आपत्कालीन परिस्थितीत कराल? तज्ज्ञांनी सांगितलं...
देशव्यापी मॉक ड्रिल, आपत्कालीन परिस्थितीत कराल? तज्ज्ञांनी सांगितलं....
भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे 5 तुकडे, कारण...
भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे 5 तुकडे, कारण....
चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्...
चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्....
युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी...
युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी....
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय.
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी.
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले...
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले....
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.