AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Washim : निंबी सिंचन प्रकल्पाचं काम मागील 10 वर्षांपासून अर्धवट, 500 एकरहून अधिक शेत जमीन…

आम्ही आमच्या शेत जमिनी या सिंचन प्रकल्पासाठी दिल्यात, ज्यामुळं आमच्या इतर शेतीला पाणी मिळेल. मात्र तसं झालं नाही. अधिकाऱ्यांनी चालढकल केल्यानं...

Washim : निंबी सिंचन प्रकल्पाचं काम मागील 10 वर्षांपासून अर्धवट, 500 एकरहून अधिक शेत जमीन...
Washim farmer nibi irrigationImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Apr 03, 2023 | 12:02 PM

वाशिमच्या : वाशिमच्या (Washim) मंगरुळपिर (mangarulpir) तालुक्यातील निंबी सिंचन (Nimbi irrigation) प्रकल्प मागील 10 वर्षांपासून लाल फित शाईत अडकल्यानं याचं काम अर्धवट अवस्थेत आहे. यामुळं शेकडो हेक्टर शेतीला पाणी मिळत नाही. अनेक शेतकरी सिंचनापासून वंचित राहिल्यानं शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप असून हा अर्धवट प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी चांगला प्रकल्प व्हावा म्हणून जागा दिली आहे. 2013 मध्ये सिंचन प्रकल्प निर्मितीला सुरुवात झाली असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

वाशिमच्या निंबी परिसरातील 500 एकर हुन अधिक शेतीचं सिंचन होऊन माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघावा यासाठी 2013 मध्ये सिंचन प्रकल्प निर्मितीस सुरुवात झाली. काही दिवस या प्रकल्पाचं काम सुरू झालं, मात्र ते काम बंद पडलं. हे काम पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी मृद व जलसंधारण विभागाकडे अनेकदा पाठपुरावा केला. मात्र त्यांच्या मागणीला अधिकाऱ्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्यानं या प्रकल्पाचं काम रखडलं असल्याची खंत शेतकरी बोलून दाखवत आहेत.

निंबी सिंचन प्रकल्प मागील 10 वर्षांपासून अर्धवट आहे. हा सिंचन प्रकल्प जर वेळेत पूर्ण झाला असता तर आमची 500 एकरहून अधिक शेत जमीन सिंचनाखाली येऊन शेतकऱ्यांना चांगली पिकं घेता आली असती. आम्ही अनेकदा अधिकाऱ्यांकडे मागणी केली. मात्र अद्याप या प्रकल्पाचं काम सुरू झालं नाही जर हे काम लवकर सुरू झालं नाही तर आम्ही शेतकरी तीव्र आंदोलन करणार असल्याचं पवन टोपले, शेतकरी यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

आम्ही आमच्या शेत जमिनी या सिंचन प्रकल्पासाठी दिल्यात, ज्यामुळं आमच्या इतर शेतीला पाणी मिळेल. मात्र तसं झालं नाही. अधिकाऱ्यांनी चालढकल केल्यानं हा प्रकल्प अपूर्ण असून लवकरात लवकर हा अर्धवट प्रकल्प शासनानं पूर्ण करावा असं शेतकरी डिगांबर टोपले यांनी सांगितले.

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...