AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur : पिकांसाठी आणलेले किटनाशक शेतकऱ्यानेच प्राशन केले, वडिलांपाठोपाठ तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

अमित मोरे आणि त्यांच्या भावामध्ये 10 एक्कर शेती आहे. यंदाच्या खरिपात त्यांनी सोयाबीन- मिरची व कापूस पिकाची लागवड केली होती. याकरिता त्यांनी दोन लाखाचे कर्जही घेतले होते. मात्र, हंगामाच्या सुरवातीपासून निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम पिकांवर झालेला आहे. सुरवातीला पावसाने उघडीप दिली तर नंतर अतिवृष्टी. यामध्ये मोरे यांची शेतजमिनीच खरडून गेली आहे.

Chandrapur : पिकांसाठी आणलेले किटनाशक शेतकऱ्यानेच प्राशन केले, वडिलांपाठोपाठ तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
शेतकरी आत्महत्या
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 11:53 AM

चंद्रपूर : (The vagaries of nature) निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम केवळ पिकांपुरता मर्यादित राहिलेला नाहीतर तो आता शेतकऱ्यांच्या जीवावरही बेतत आहे. (Heavy Rain) अधिकच्या पावसामुळे पिकांचे तर नुकसान झालेच आहे पण शेतजमिनीही खरडून गेल्या आहेत. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि घेतलेल्या कर्जाची परतफेड करावी कशी या विवंचनेतून राजुरा तालुक्यातील अमित मोरे (22) या तरुण शेतकऱ्याने कीड-रोगराईचा बंदोबस्त करण्याासाठी आणलेले किटकनाशक पिऊनच (Farmer suicide) आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे गतवर्षी पिकांचे झालेले नुकसान आणि नापिकी यामुळे अमितच्या वडिलांनी देखील आत्महत्याच केली होती. त्यामुळे शेती करावी कशी असा सवाल तरुण शेतकऱ्यांपुढे देखील आहे. पेरणी होताच झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हे नुकसान भरुन कसे काढावे या विवंचनेत शेतकरी आहेत.

गतवर्षीच वडिलांची आत्महत्या अन् यंदा मुलाची

गेल्या काही वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या जीवनमानावर होत आहे. गतवर्षी खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे नापिकी आणि झालेले नुकसान पाहून अमित मोरे यांच्या वडिलांनी देखील आत्महत्याच केली होती. यंदा पुरामुळे पिकेच नाहीतर शेत जमिनीही खरडून गेल्याने काय करावे या नैराश्यातून अमितनेही वडिलांप्रमाणेच आपले जीवन संपवले आहे. विशेष म्हणजे पिकांतील रोगराईचा बंदोबस्त करण्यासाठी त्याने आणलेले किटकनाशकच प्राशन करुन त्याने जीवन संपवले आहे.

10 एक्कर शेती अन् 2 लाखाचे कर्ज

अमित मोरे आणि त्यांच्या भावामध्ये 10 एक्कर शेती आहे. यंदाच्या खरिपात त्यांनी सोयाबीन- मिरची व कापूस पिकाची लागवड केली होती. याकरिता त्यांनी दोन लाखाचे कर्जही घेतले होते. मात्र, हंगामाच्या सुरवातीपासून निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम पिकांवर झालेला आहे. सुरवातीला पावसाने उघडीप दिली तर नंतर अतिवृष्टी. यामध्ये मोरे यांची शेतजमिनीच खरडून गेली आहे. पिकांचे नुकसान भरुन निघाले असते पण जमिनाचे काय ? यामधूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

हे सुद्धा वाचा

भावाच्या मदतीने शेती व्यवसाय

गतवर्षी अमित मोरे यांच्या वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर अमितचा भाऊ आणि ते दोघे मिळून शेती करीत होते. भावाच्या मदतीने शेती करून कुटुंबाला हातभार लावला होता. मात्र ताज्या पुराच्या संकटाने दोन लाख रुपये कर्ज असलेला हा शेतकरी खचला आणि त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. या युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एकीककडे सरकार मोठ-मोठ्या घोषणा करीत आहे. अन् स्थानिक पातळीवर भलतेच चित्र आहे.

मुंडेंकडून 18 तुकडे करण्याची धमकी; करुणा शर्मांचा गंभीर आरोप
मुंडेंकडून 18 तुकडे करण्याची धमकी; करुणा शर्मांचा गंभीर आरोप.
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?.
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली.
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार.
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा.
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत.
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी.
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक.
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका.
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?.