Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी कार घ्यायची आहे का? Toyota च्या नव्या कार येताय, जाणून घ्या

टोयोटा किर्लोस्कर मोटरला चालू आर्थिक वर्ष 2025-26 मध्येही विक्रीवाढीचा वेग कायम राहण्याची अपेक्षा आहे. उत्पादन क्षमता वाढविणे, विक्रीचे जाळे वाढविणे आणि नवीन मॉडेल्स सादर करण्याची कंपनीची योजना आहे. ग्रामीण भाग आणि छोट्या शहरांमध्ये आपली उपस्थिती वाढविण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

नवी कार घ्यायची आहे का? Toyota च्या नव्या कार येताय, जाणून घ्या
Toyota Kirloskar MotorImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 12, 2025 | 7:24 PM

टोयोटाच्या नव्या कार भारतात लाँच होणार आहेत. इतर कार कंपन्यांनीही या वर्षासाठी कंबर कसली आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा आणि महिंद्रानंतर भारतातील पाचव्या क्रमांकाची कार उत्पादक कंपनी टोयोटा किर्लोस्कर मोटरनेही (टीकेएम) आपली आगामी रणनीती आखली असून यंदाही आपली विक्री चांगली राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. याविषयी विस्ताराने जाणून घेऊया.

लवकरच लाँच होणार नव्या कार

यंदा कंपनीला आपले विक्रीचे जाळे वाढवायचे असून नवीन मॉडेल्स बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षी कंपनीची विक्री चांगली झाली होती. एसयूव्ही आणि एमपीव्ही सारख्या वाहनांच्या मागणीत वाढ होण्याची कंपनीची अपेक्षा आहे. टीकेएम उत्पादन क्षमता वाढविण्यावर आणि पर्यावरणासाठी चांगले काम करण्यावर देखील लक्ष केंद्रित करीत आहे. बॅटरीवर चालणारी वाहने, म्हणजेच ईव्ही आणण्याच्या तयारीत ही कंपनी आहे. त्याचबरोबर छोट्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये ही कंपनी आपली व्याप्ती वाढवू इच्छिते.

एसयूव्ही-एमपीव्हीच्या मागणीत वाढ

टीकेएमचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, टोयोटा इंडियाला यावर्षीही चांगल्या विक्रीची अपेक्षा आहे. कंपनी विक्रीसाठी आपल्या केंद्रांची संख्या वाढवणार असून नवीन मॉडेल्सही सादर करणार आहे. गेल्या वर्षी कंपनीने विक्रमी कार विकल्या होत्या. एसयूव्ही आणि एमपीव्हीची मागणी यावर्षीही कायम राहील, अशी कंपनीची अपेक्षा आहे.

उत्पादन क्षमता वाढविण्यावर भर

पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना वाधवा म्हणाले की, कंपनी उत्पादन क्षमता वाढविण्यावर काम करत आहे. त्याचबरोबर पर्यावरण रक्षणासाठी इलेक्ट्रिक वाहने बनविण्यावरही कंपनीचा भर आहे. येत्या काळात कंपनी इलेक्ट्रिक वाहनेही बाजारात आणणार आहे. लहान कारपासून मोठ्या वाहनांपर्यंत, आता आपल्याकडे असलेल्या वाहनांची संख्या आणि उत्पादन क्षमतेत झालेली वाढ आणि विक्रीसाठी टियर 2 आणि 3 शहरांमध्ये नेटवर्कचा विस्तार यामुळे आम्ही आणखी मजबूत होऊ शकतो, असा विश्वास वाधवा यांनी व्यक्त केला.

निर्यातही वाढली

सध्या देशभरात टीकेएमचे सुमारे 1100 विक्री केंद्र आहेत. वाधवा म्हणाले की, सुझुकीसोबत जवळून काम केल्याने कंपनीला ग्लॅन्झा आणि अर्बन क्रूझर टायगर सारखी मॉडेल्स बाजारात आणण्यास मदत झाली आहे. लोकांना या गाड्या खूप आवडल्या आहेत. कंपनी इतर देशांनाही मेड इन इंडिया कार निर्यात करत असून त्याची वाढही चांगली होत आहे. वाधवा म्हणाले की, 2024-25 या आर्थिक वर्षात टीकेएमची निर्यात मागील वर्षाच्या तुलनेत 59 टक्क्यांनी वाढली आहे.

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.