Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saving Account : खातेदाराच्या मृत्यूनंतर या व्यक्तीला मिळतो बचतीचा पैसा, पण त्यासाठी ही कागदपत्रे हवीत जवळ..

Saving Account : खातेदाराच्या मृत्यूनंतर बँकेतील रक्कम कोणाला मिळते? त्यासाठी काय करावी लागते कसरत..

Saving Account : खातेदाराच्या मृत्यूनंतर या व्यक्तीला मिळतो बचतीचा पैसा, पण त्यासाठी ही कागदपत्रे हवीत जवळ..
रक्कम मिळणार कोणाला?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 22, 2022 | 5:05 PM

नवी दिल्ली : आता जवळपास प्रत्येकाचं बँकेत खाते (Bank Account) असतेच असते. खातेदारच्या (Account Holder) मृत्यूनंतर (Death) त्याच्या खात्यातील रक्कम (Saving Amount) कोणाला मिळते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. घरातील कर्त्या व्यक्तीकडे ही रक्कम देण्यात येईल असा जर तुमचा समज असेल तर सपशेल खोटा आहे. कारण ही रक्कम मिळते..

बँकेत खाते उघडताना तुमच्याकडून वारसदाराची (Nominee) माहिती असलेला अर्ज भरून घेण्यात येतो. या अर्जामध्ये वारसदाराचे नाव, वय आणि त्याचा तपशील आणि संबंधित कागदपत्रे (KYC) जमा केलेली असतात.

बँक खातेदाराच्या मृत्यूनंतर ही रक्कम त्याच्या वारसाला देण्यात येते. त्यासाठी वारसाकडून खातेदाराशी संबंधित कागदपत्रांचा पडताळा घेण्यात येतो. त्याची खात्री झाल्यावर ही रक्कम वारसाच्या सुपूर्द करण्यात येते.

हे सुद्धा वाचा

बचत खाते उघडताना अर्जामध्ये वारसाचे नाव, त्याचे खातेदाराशी नाते, त्याचे वय, पत्ता आणि ओळखपत्र क्रमांक यांची माहिती समाविष्ट करण्यात येते. त्याआधारे खातेदाराचे वारस म्हणून त्या व्यक्तीचे नाव नोंदविण्यात येते.

बचत खातेदार कोणालाही त्याचा वारस नेमू शकतो. यामध्ये आई-वडिल, बहिण, भाऊ, पत्नी, मुलं यांचा समावेश आहे. तसेच त्याला वारसदार बदलविता ही येतो. वारसदार निवडीचा अधिकार खातेदाराचा असतो.

वारसाऐवजी दुसरा व्यक्ती बँकेकडे सदर रक्कमेची मागणी करु शकत नाही. त्रयस्थ व्यक्तीने मागणी जरी केली तरी बँक अशा व्यक्तीला ही रक्कम देत नाही. खातेदाराच्या मृत्यूनंतर सदर रक्कम एकतर बँकेतून काढता येते अथवा ती वारसदाराच्या खात्यात हस्तांतरीत करता येते.

खातेदाराच्या मृत्यूनंतर वारसदाराला त्याचे ओळखपत्र दाखवावे लागते. खातेदाराचे मृत्यू प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे दाखवावी लागतात. त्याआधारे बचत खात्यातील रक्कम वारसाच्या खात्यात वळती करण्यात येते.

जर खातेदाराने पती,पत्नी, आई-वडिल, भाऊ, बहिण यांना वारसदार नेमले नसेल. तर त्याच्या कुटुंबातील मोठ्या व्यक्तीला या रक्कमेवर हक्क सांगता येतो. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला वारस म्हणून दावा सांगता येतो. पण ही प्रक्रिया वेळ खाऊ आहे.

'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी.
आता मुंबईतच सिंगापूर... निसर्गाच्या सान्निध्यातील पहिलाच 'उन्नत मार्ग'
आता मुंबईतच सिंगापूर... निसर्गाच्या सान्निध्यातील पहिलाच 'उन्नत मार्ग'.
औरंगजेब इथ गाडला असा बोर्ड लावा, राज ठाकरेंनी कबरीच्या वादावरून सुनावल
औरंगजेब इथ गाडला असा बोर्ड लावा, राज ठाकरेंनी कबरीच्या वादावरून सुनावल.
बीड हादरलं! तरुणाची दगडाने ठेचून हत्या, कन्नापुरमध्ये खळबळ
बीड हादरलं! तरुणाची दगडाने ठेचून हत्या, कन्नापुरमध्ये खळबळ.
कराड फिल्म प्रोड्यूसर? निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा अन्..
कराड फिल्म प्रोड्यूसर? निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा अन्...
कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट
कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट.
बीडच्या मशिदीत स्फोट, रात्री अडीचच्या सुमारास मोठा आवाज अन्...
बीडच्या मशिदीत स्फोट, रात्री अडीचच्या सुमारास मोठा आवाज अन्....
'काका आहे का गं?' बोलणाऱ्या कावळ्याची एकच धूम, बघा tv9 मराठीवर...
'काका आहे का गं?' बोलणाऱ्या कावळ्याची एकच धूम, बघा tv9 मराठीवर....
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.