AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO : गरजेच्या वेळी काढता येणार पैसा, वारंवार दावा फेटाळण्याची नको चिंता, ईपीएफओचा कर्मचाऱ्यांना देणार फायदा

EPFO : कर्मचाऱ्यांना ईपीएफओने मोठा दिलासा दिला आहे..

EPFO : गरजेच्या वेळी काढता येणार पैसा, वारंवार दावा फेटाळण्याची नको चिंता, ईपीएफओचा कर्मचाऱ्यांना देणार फायदा
दाव्याची चिंता नकोImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 08, 2022 | 8:41 PM

नवी दिल्ली : जरी तुमचा EPF दावा वारंवार नामंजूर होत असेल तर आता त्यासाठी जास्त चिंता करण्याची गरज नाही. कारण निकडीच्यावेळी तुम्हाला आता रक्कम काढता येणार आहे. भविष्य निर्वाह कर्मचारी संघटनेने (EPFO) याविषयी देशभरातील क्षेत्रीय कार्यालयांना पत्र पाठवलं आहे. त्यांनी पत्रात दावे (Claim) निकाली काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे दावे फेटाळण्याचे टाळण्यात येईल. तसेच दावा का फेटाळण्यात येत आहे, याची सुस्पष्ट कारण सदस्याला द्यावे लागणार आहे. त्यामुळे आता कार्यालयांवर दबाव आला आहे.

EPFO ने सर्वात अगोदर प्रत्येक दावा तपासण्याचे, बारकाईने त्याची गरज लक्षात घेण्याचे निर्देश दिले आहेत. एकाच कारणासाठी वारंवार दावे फेटाळण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ईपीएफओने याविषयी कडक भूमिका घेतली आहे. कर्मचाऱ्यांना निकडीच्यावेळी रक्कम मिळावी यासाठी निर्देश देण्यात आले आहे.

क्षेत्रीय कार्यालयांनी एकाच कारणासाठी किती क्लेम रिजेक्ट केले, याचा अहवाल मागविण्यात आला आहे. महिन्याभराच्या डेटानुसार हा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवायचा आहे. काही क्षेत्रीय कार्यालयात कर्मचाऱ्यांचे दावे फेटाळण्यासाठी स्वतःचाचे नियम हाकत असल्याचे उघड झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

या चुकीच्या नियमावलीमुळे कर्मचाऱ्यांना गरजेच्यावेळी रक्कम मिळण्यात अडचण येत होती. कर्मचाऱ्यांनी याविषयी संघटनेकडे तक्रार केली. अशा तक्रारींची संख्या वाढल्यानंतर दावा फेटाळण्यासंबंधीचे नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे आता दावा फेटाळण्याची कारणे द्यावी लागणार आहेत.

आता छोट्या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनाही भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती योजना आणि विम्याचा लाभ मिळेल. कंपन्यांना यामध्ये त्यांचा वाटा देता येणार आहे. इकोनॉमिक्स टाईम्सने याविषयीचा अहवाल दिला आहे. त्यानुसार, केंद्र सरकार त्यासाठी लवकरच नियमांमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. यामुळे अगदी 10 कर्मचारी संख्या असलेल्या कंपनीतील कामगारांनाही लाभ मिळणार आहे.

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याच्या मास्टरप्लानचं टुलकिट सापडलं
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याच्या मास्टरप्लानचं टुलकिट सापडलं.
Amul Milk : तुम्ही अमूल दूध खरेदी करतात? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
Amul Milk : तुम्ही अमूल दूध खरेदी करतात? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
ऑडिओ - विज्यूअल आणि मनोरंजन शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी दाखल
ऑडिओ - विज्यूअल आणि मनोरंजन शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी दाखल.
भारत-पाकच्या तणावादरम्यान बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ...
भारत-पाकच्या तणावादरम्यान बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ....
'सरकार मोदी की सिस्टिम राहुल गांधीकी', संजय राऊतांचा खोचक टोला
'सरकार मोदी की सिस्टिम राहुल गांधीकी', संजय राऊतांचा खोचक टोला.
मुंबईच्या हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची आपुलकीची भेट
मुंबईच्या हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची आपुलकीची भेट.
'जिथे खड्डे खोदले तिथेच..', वक्फच्या अधिकाऱ्यांना जलील यांची धमकी
'जिथे खड्डे खोदले तिथेच..', वक्फच्या अधिकाऱ्यांना जलील यांची धमकी.
मी निवडून आलो असतो, तर शिंदे मुख्यमंत्री झाले असते - शहाजी बापू पाटील
मी निवडून आलो असतो, तर शिंदे मुख्यमंत्री झाले असते - शहाजी बापू पाटील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर.
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार.