Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशाचा सुर्वणकाळ पाहिलेला उद्योगपती, भारताचे ‘स्टिल मॅन’ जमशेद जे ईराणी यांचं निधन

स्टिल मॅन ऑफ इंडिया यांचं निधन झालं आहे. पद्म विभूषण डॉ. जमशेद जे ईराणी यांच्या निधनाचं वृत्त देताना आम्हाला खूप दु:ख होत आहे. त्यांनी 31 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजता जमशेदपूर येथे शेवटचा श्वास घेतला.

देशाचा सुर्वणकाळ पाहिलेला उद्योगपती, भारताचे 'स्टिल मॅन' जमशेद जे ईराणी यांचं निधन
देशाचा सुर्वणकाळ पाहिलेला उद्योगपती, भारताचे 'स्टिल मॅन' जमशेद जे ईराणी यांचं निधनImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 01, 2022 | 10:55 AM

नवी दिल्ली: देशाचा सुवर्णकाळ पाहिलेले उद्योगपती आणि भारताचे स्टिल मॅन (Steel Man of India) अशी ओळख असणारे ज्येष्ठ उद्योगपती जमशेद जे ईराणी (Jamshed J Irani) यांचं काल सोमवारी निधन झालं. जमशेदपूर (Jamshedpur) येथे त्यांनी अंतिम श्वास घेतला. ते 86 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी डेजी ईराणी, मुलं जुबिन, निलोफर आणि तनाज आदी आहेत. त्यांच्या निधनामुळे उद्योग जगतातील भीष्म पितामह हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

टाटा स्टिलने एक निवेदन जारी करून जमशेद जे ईराणी यांच्या निधनाचं वृत्त दिलं आहे. स्टिल मॅन ऑफ इंडिया यांचं निधन झालं आहे. पद्म विभूषण डॉ. जमशेद जे ईराणी यांच्या निधनाचं वृत्त देताना आम्हाला खूप दु:ख होत आहे. त्यांनी 31 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजता जमशेदपूर येथे शेवटचा श्वास घेतला, असं या निवेदनात म्हटलं आहे. ईराणी हे जून 2011 मध्ये टाटा स्टिलच्या बोर्डातून निवृत्त झाले होते.

हे सुद्धा वाचा

परदेशात शिक्षण घेतल्यानंतर जमशेद ईराणी यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. 1968मध्ये टाटा आयर्न अँड स्टिल कंपनीत सामिल होण्यासाठी ते भारतात आले. आता ही कंपनी टाटा स्टिल या नावाने ओळखली जाते. या कंपनीचे प्रभारी संचालक म्हणून त्यांनी कामास सुरुवात केली होती.

टाटा स्टिल आणि टाटा सन्सशिवाय डॉ. ईराणी यांनी टाटा मोटर्स आणि टाटा टेलिसर्व्हिसेससहीत टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांमध्ये संचालक म्हणून काम पाहिलं. 1978मध्ये ते टाटा स्टिलचे जनरल सुपरिटेंडेंट बनले. 1979मध्ये जनरल मॅनेजर बनले. 1985मध्ये टाटा स्टिलचे प्रेसिडेंट बनले. 1988मध्ये त्यांनी ज्वॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून पदभार स्वीकारला. 1992मध्ये ते मॅनेजिंग डायरेक्टर बनले. त्यानंतर 2001मध्ये ते कंपनीतून निवृत्त झाले.

'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.