AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rice Price : घरातल्या भाताला महागाईची फोडणी, टोमॅटो, डाळीनंतर तांदळाचा नंबर

Rice Price : पाकिस्तानला नावं ठेवता ठेवता भारतातही अनेक खाद्यवस्तू, भाजीपाल्याने महागाईकडे कधी आगेकूच केली हे अनेकांना कळलेच नाही. टोमॅटो, डाळी नंतर आता तांदुळाचा नंबर लागला आहे.

Rice Price : घरातल्या भाताला महागाईची फोडणी, टोमॅटो, डाळीनंतर तांदळाचा नंबर
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 2:51 PM

नवी दिल्ली : देशातील खाद्यपदार्थांच्या, भाजीपाल्याचे भाव (Vegetables Price) वाढल्याने सर्वसामान्य नागरिक बेहाल आहेत. टोमॅटो (Tomato) , कांदा, इतर भाजीपाल्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. आता क्रमांक सर्वांचा लाडक्या तांदळाचा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाच्या किंमती (Rice Price Hike) गेल्या 11 वर्षांतील उच्चांकावर पोहचल्या आहेत. भारत हा सर्वात मोठा उत्पादक असताना, देशात तांदळाच्या किंमती रंग दाखविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जेवणात तांदळाचा आधार असणाऱ्या गरिबांना मोठा फटका बसू शकतो. त्यांचे खाण्याचे वांदे होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारचे महागाई कमी करण्याच्या प्रयत्नांना मान्सूनचे पण गालबोट लागले आहे. हवामानातील बदलाचा विपरीत परिणाम दिसून येत आहे.

अल-नीनो मुळे गणित बिघडले अलनीनोमुळे सध्या भारतीय पिकांचं आणि उत्पादनाचं गणित बिघडलं आहे. त्याचा विपरीत परिणाम भारतीय शेती आणि शेतकऱ्यांवर पडत आहे. त्यामुळे तांदळाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. भारत जगातील मोठा तांदुळ निर्यातक आहे.

गरिबांवर संकट तांदळाच्या किंमती वाढणे ही काही सामान्य बाब नाही. आफ्रिकन राष्ट्रात तांदळाचा मोठ्या प्रमाणात आहारात समावेश होतो. देशातील एक वेळच्या भोजनाला महाग जनतेला तांदळाचा आधार आहे. स्वस्तात पोट भरण्याचे खाद्य म्हणून त्याकडे पाहिले जाते. तांदळाच्या किंमती वाढणे म्हणजे, त्यांच्या ताटातील उरलासुरला भात ही गायब करण्यासारखे आहे.

हे सुद्धा वाचा

भारत करतो तांदळाची निर्यात भारत जगाला तांदळाचा पुरवठा करतो. जगातील तांदळात भारताचा वाटा 40 टक्क्यांहून अधिक आहे. गेल्यावर्षी 2022 मध्ये भारताने 5.6 कोटी टन तांदळाची निर्यात केली होती. परंतु यावर्षी तांदळाचा पुरवठा कमी असल्याने भाव वाढले आहेत. रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात महागाईचे चटके सहन करावे लागत आहेत.

3 अब्ज लोकांचे खाद्य जगभरातील 3 अब्ज लोकांचे तांदुळ हे मुख्य जेवण आहे. तांदळाचे 90 टक्क्यांहून अधिक उत्पादन एकट्या आशियात होते. तांदळाच्या शेतीला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. अलनीनोमुले यावर्षी आशिया आणि आफ्रिका खंडात हवामानाची स्थिती चिंताजनक आहे.

भाव 11 वर्षांच्या उच्चांकावर हंगामात पाऊस न पडणे, उन्हाळ्यात बेमौसमी पाऊस पडणे असे प्रकार आता वाढले आहेत. ग्लोबल वार्मिंगचा परिणाम शेतीवर दिसून येत आहे. उत्पादनात मोठी घट येत आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या तांदळाचा भाव 9 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या दोन वर्षांपासून भारतातही तांदुळ आणि गव्हाचे दर वाढले आहे. सध्या जागतिक बाजारात तांदळाच्या किंमती 11 वर्षांच्या उच्चांकावर पोहचल्या आहेत.

पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?.