Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीओनंतर ‘एलआयसी’ व्यावसायिक धोरणांमध्ये बदल करणार, खासगी विमा कंपन्यांना मोठा फटका!

लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एलआयसी (LIC IPO) लवकरच आपला आयपीओ (IPO) आणणार आहे. आयपीओनंतर एलआयसी आपल्या पॉलिसी धोरणांमध्ये (Changes in policy) बदल करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास एसआयसीच्या नव्या धोरणांचा मोठा फटका हा खासगी विमा कंपन्यांना बसू शकतो.

आयपीओनंतर 'एलआयसी' व्यावसायिक धोरणांमध्ये बदल करणार, खासगी विमा कंपन्यांना मोठा फटका!
एलआयसी आयपीओ
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 11:43 PM

नवी दिल्ली : लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एलआयसी (LIC IPO) लवकरच आपला आयपीओ (IPO) आणणार आहे. आयपीओनंतर एलआयसी आपल्या पॉलिसी धोरणांमध्ये (Changes in policy) बदल करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास एसआयसीच्या नव्या धोरणांचा मोठा फटका हा खासगी विमा कंपन्यांना बसू शकतो. आयपीओबाबत एलआयसीने सेबीकडे दाखल केलेल्या अर्जाच्या तपशीलाचे विश्लेषण केल्यानंतर स्विस ब्रोकरेज फर्म क्रेडिट सुइसच्या वतीने हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. क्रेडिट सुइसने आपल्या अहवालात म्हटले आहे की, आयपीओनंतर एलआयसीच्या पॉलिसी धोरणांमध्ये काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक फटका हा खासगी विमा कंपन्या एसबीआय लाइफ, आयसीआयसीआय, एचडीएफसी लाइफ आणि मॅक्स लाइफ सारख्या आयुर्विमा कंपन्यांना बसण्याची शक्यता आहे. एलआयसीमध्ये झालेल्या या नव्या बदलामुळे खासगी विमा कंपन्याचे नुकसान होऊ शकते.

मार्जिनमध्ये वाढ

या अहवालात पुढे म्हटले आहे की, एलआयसीने आपले मार्जिन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एलआयसीने आपले मार्जिन वाढवून सात टक्क्यांहून 9.9 टक्क्यांवर आणले आहे. सरकारने सरप्लस आणि नफा वितरण नियमांमध्ये बदल केल्याने कंपनीचा मार्जिन वाढवण्याचा मार्ग सोपा झाला आहे. याचा फायदा हा एलआयसीला होणार आहे. दरम्यान देशाने उदारीकरणाचे धोरण स्वीकारून अनेक वर्षांचा काळ लोटला आहे. आपण उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यानंतर खासगीकरणाला चालना मिळाली. मात्र अशाही स्थितीमध्ये विमाधारकांचा एलआयसीवरील विश्वास कायम आहे. देशभरातील एकूण विमाधारकांपैकी सुमारे 66 टक्के विमा पॉलिसी या एलआयीमध्ये आहेत. तर 44 टक्के विमा पॉलिसी या खासगी कंपन्यांकडे आहे.

कोविडच्या काळात विमा पॉलिसींची संख्या वाढली

देशावर गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनाच्या या अनपेक्षित संकटामुळे अनेकापुढे आर्थिक संकट उभे राहिले. कोरोना रुग्णांच्या उपचारावर मोठ्याप्रमाणात खर्च झाला. अचानक अशाप्रकारचे संकट उभे राहिल्यास काहीतर संरक्षण हवे या उद्देशाने या काळात अनेकांनी हेल्थ पॉलिसी काढण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे या दोन वर्षांच्या काळात मोठ्या प्रमाणात विमा पॉलिसिच्या संख्येत वाढ झाल्याचे समोर आले आहे.

संबंधित बातम्या

अवघ्या 6 हजारात 1 एकर, ती पण डायरेक्ट चंद्रावर! प्रोफेसरनं कशी केली चंद्रावरील जमिनीची डील?

महागाईची तिसरी लाट येणार?; उत्पादन, सेवा क्षेत्रात दरवाढ अटळ

तुम्हाला माहित आहे का वारसाहक्कात संपत्तीसोबतच कर्जही मिळते; जाणून घ्या कोणकोणत्या कर्जाची परतफेड करावी लागू शकते

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.