Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरांसाठी म्हाडा पालघर, रायगड, ठाणे जिल्ह्यातील जमीनी ताब्यात घेणार; संबंधित विभागाकडे प्रस्ताव दाखल

म्हाडाची घरे खरेदी करण्याकडे सध्या ग्राहकांचा कल वाढत आहे. मात्र सध्या मोकळी जागा नसल्याने परवडणारी घरे उपलब्ध करणे शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर कोकण मंडळाने म्हाडाची घरे बांधण्यासाठी मोकळय़ा जमिनी विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

घरांसाठी म्हाडा पालघर, रायगड, ठाणे जिल्ह्यातील जमीनी ताब्यात घेणार; संबंधित विभागाकडे प्रस्ताव दाखल
मुंबईत म्हाडाची 4 हजार घरांची सोडत निघणार
Follow us
| Updated on: Nov 30, 2021 | 10:37 AM

मुंबई : म्हाडाची घरे खरेदी करण्याकडे सध्या ग्राहकांचा कल वाढत आहे. मात्र सध्या मोकळी जागा नसल्याने परवडणारी घरे उपलब्ध करणे शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर कोकण मंडळाने म्हाडाची घरे बांधण्यासाठी मोकळय़ा जमिनी विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ निर्णयच घेण्यात आला नाही तर मंडळ कामाला देखील लागले आहे. पालघर, रायगड आणि ठाणे येथील शासकीय जमिनी मंडळाने शोधून काढल्या आहेत. या जमिनी सरकारी नियमानुसार ताब्यात मिळाव्यात यासाठी मंडळाकडून सरकारकडे प्रस्ताव देखील पाठवण्यात आला आहे. हे एकूण  274.11 हेक्टर क्षेत्र असून, ते मिळवण्यासाठी कोकण मंडळाकडून प्रयत्न सुरू आहेत.

महसूल, पाटबंधारे विभागांच्या मालकीच्या जागा 

दरम्यान कोकण मंडळाच्या या प्रयत्नांना यश आल्यास भविष्यात पालघर, रायगड आणि ठाण्यात मोठ्या संख्येने म्हाडाची घरे उपलब्ध होतील. याचा फायदा सर्वसामान्य ग्राहकांना होणार असून, त्यांना परवडणाऱ्या घरांचा लाभ मिळू शकतो. मंडळाने संबंधित जिल्ह्यात शोधलेल्या या जागा महसूल विभाग, जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभाग यांच्या मालकीच्या आहेत. या जागा ताब्यात घेण्यासाठी राज्य सरकार तसेच संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. लवकरच या जागांचा ताबा मिळून बांधकामाला सुरुवात होईल अशा विश्वास मंडळाने व्यक्त केला आहे.

मफतलाल कंपनीची जमीन मिळवण्यासाठी प्रयत्न

दरम्यान परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी कळव्यामधील मफतलाल कंपनीची जमीन ताब्यात मिळावी, अशी मागणी मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यासाठी उच्चा न्यायालयात अर्ज देखील करण्यात आला आहे. ही जमीन ताब्यात आल्यास या जमीनीवर 30 हजारांहून अधिक घरांचा मोठा प्रकल्प उभारणे शक्य असल्याचे म्हाडाने म्हटले आहे. यामुळे अनेक नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर उपलब्ध होऊ शकते.

संबंधित बातम्या 

आता असंघटीत क्षेत्रातील मजुरांनाही मिळणार पेन्शन; ‘असे’ असेल योजनेचे स्वरूप

कारभारात त्रुटी असल्याचा ठपका; आरबीआयकडून रिलायन्स कॅपिटलचे संचालक मंडळ बरखास्त

तुम्हाला नवीन व्यवयाय सुरू करायचाय? तर जीएसटीबाबत जाणून घ्या ‘हे’ महत्त्वाचे नियम

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.