AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता असंघटीत क्षेत्रातील मजुरांनाही मिळणार पेन्शन; ‘असे’ असेल योजनेचे स्वरूप

असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अशा सर्व मजुरांना वयाच्या साठ वर्षानंतर दरमहा पेन्शन देण्य़ाच्या योजनेवर केंद्र सरकारकडून काम सुरू आहे. या योजनेंतर्गंत मजुरांना घरबसल्या पैशे मिळणार आहेत.

आता असंघटीत क्षेत्रातील मजुरांनाही मिळणार पेन्शन; 'असे' असेल योजनेचे स्वरूप
संग्रहित छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 30, 2021 | 9:57 AM
Share

नवी दिल्ली : असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अशा सर्व मजुरांना वयाच्या साठ वर्षानंतर दरमहा पेन्शन देण्य़ाच्या योजनेवर केंद्र सरकारकडून काम सुरू आहे. या योजनेनुसार नोंदणी केलेल्या असंघटीत क्षेत्रातील मजुरांना वयाच्या साठ वर्षानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. मजुरांसाठी देण्यात येणाऱ्या पेन्शनचा खर्ज हा देणगीदारांच्या पैशातून भागवला जाणार आहे. या योजनेसाठी देणगी देण्याचे आवाहन कामगार मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.

60 वर्षानंतर मिळणार पेन्शन

याबाबत माहिती देताना कामगार मंत्रालयाने म्हटले आहे की, ही योजना असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी आहे. वयाचे साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांचे वृद्धत्व सुखासमाधानाने जावे. त्यानंतर त्यांना काम करण्याची आवश्यकता भासू नये, यासाठी केंद्राने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत मजुरांना निवृत्तीनंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. या पेन्शनसाठी लागणारा पैसा हा देणगीमधून गोळा करण्यात येईल. ज्या देणगीदाराची या योजनेत सहभागी होण्याची इच्छा आहे, त्यांच्याकडून एकरकमी 36 हजार रुपये घेण्यात येतील. या देणगीमधून आलेला सर्व पैसा हा, पंतप्रधान श्रमयोगी मानधनमध्ये (पीएमएसवायएम) जमा होणार आहे. त्यानंतर यातून असंघटीत क्षेत्रातील मजुरांना पेन्शन देण्यात येईल. थोडक्यात ही योजना गरिबाना उज्वला गॅस योजनेंंतर्गत देण्यात येणाऱ्या सबसीडी सारखी आहे. गरीबांना अदिकाधिक सबसीडी मिळावी यासाठी श्रीमतांना सबसी़डी सोडण्याचे आवाहन करण्यात आले होते. अशी माहिती कामगार मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

योजनेला अल्प प्रतिसाद

दरम्यान या योजनेबाबत अद्यापही असंघटीत क्षेत्रातील मजुरांमध्ये पुरेशी जनजागृती झाली नसल्याचे आकडेवारीवरून समोर येते. या योजनेला मजुरांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात केवळ 35 मजुरांनी या योजनेसाठी नोंदणी केली. तर सप्टेंबर महिन्यात हीच संख्या 85 एवढी होती. नोंदणीला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत केवळ 2366 मजुरांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे.

संबंधित बातम्या 

कारभारात त्रुटी असल्याचा ठपका; आरबीआयकडून रिलायन्स कॅपिटलचे संचालक मंडळ बरखास्त

तुम्हाला नवीन व्यवयाय सुरू करायचाय? तर जीएसटीबाबत जाणून घ्या ‘हे’ महत्त्वाचे नियम

भारतात क्रिप्टोकरन्सीचे स्वरुप नेमके कसे असणार? सरकार अधिवेशनात मांडणार विधेयक

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.