Stock Market: लोकसभा निवडणूक निकालाचा ‘या’ उद्योगसमुहाला सर्वांत मोठा फटका; शेअर्स कोसळले!

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर आज देशाचा कौल कोणत्या पक्ष-आघाडीला आहे, हे स्पष्ट होणार आहे. त्यासोबतच पुढील चार महिन्यांत महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचा कलही उघड होईल. सुरुवातीचे कल पाहता शेअर मार्केटवर मोठा परिणाम झाला आहे.

Stock Market: लोकसभा निवडणूक निकालाचा 'या' उद्योगसमुहाला सर्वांत मोठा फटका; शेअर्स कोसळले!
stock marketImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 04, 2024 | 10:30 AM

लोकसभा निवडणूक निकालाच्या सुरुवातीच्या कलांचा शेअर बाजारावर मोठा परिणाम पहायला मिळतोय. सुरुवातीचे कल पाहता एका मोठ्या उद्योगसमुहाला चांगलाच फटका बसला आहे. शेअर मार्केटची सुरुवातच नकारात्मक झाली आणि अदानी ग्रुपचे शेअर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. निवडणूक निकालाच्या एक दिवस आधी शेअर बाजारात तेजी पहायला मिळाली होती. मात्र आता नेमक्या निकालाच्या दिवशी शेअर बाजाराने अनेकांनी निराशा केली आहे. सकाळी साडेनऊ वाजता निफ्टीमध्ये जवळपास 600 अंकांची घसरण होती. तर बँक निफ्टीमध्ये 1500 अंकांनी मोठी घसरण पहायला मिळाली. सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होत आहे.

निफ्टी, बँक निफ्टीमध्ये जवळपास 3 टक्क्यांची घसरण झाली आहे. अदानी ग्रुपच्या सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये 9 टक्क्यांची घसरण, अदानी पॉवर 10 टक्के, अंबुजा सीमेंटमध्ये 10 टक्क्यांची घसरण, अदानी एंटरप्राइजेसमध्ये 10 टक्क्यांची घसरण झाली आहे. LIC मध्ये 10 टक्के, HAL मध्ये 10 टक्क्यांच्या घसरणाची नोंद झाली आहे. रिलायन्समध्ये साडेचार टक्क्यांची घसरण झाली आहे.

हे सुद्धा वाचा
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.