AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना लढ्यासाठी 1500 कोटी दिले, टाटा ग्रुपनं आता संसर्ग रोखण्यासाठी ‘हा’ मार्ग सांगितला

भारतातील प्रमुख उद्योगसमूह टाटा ग्रुपनं कोरोना लढ्यासाठी 1500 कोटी रुपयांची मदत केलेली आहे. Tata group Faster vaccination

कोरोना लढ्यासाठी 1500 कोटी दिले, टाटा ग्रुपनं आता संसर्ग रोखण्यासाठी 'हा' मार्ग सांगितला
रतन टाटा
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 3:14 PM

मुंबई : भारत सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. देशातील काही राज्ये सोडल्यास अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. भारतातील प्रमुख उद्योगसमूह टाटा ग्रुपनं कोरोना लढ्यासाठी 1500 कोटी रुपयांची मदत केलेली आहे.टाटा ग्रुपच्या कंपन्यांमधून ऑक्सिजन निर्मितीला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे टाटा ग्रुपनं क्रायोजेनिक टँकरची आयात देखील केली आहे. टाटा ग्रुपमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं लसीकरण करण्यात येत आहे. कोरोनाच्या लढ्यात योगदान देणाऱ्या टाटा ग्रुपला लसीकरण हाच कोरोना विषाणू संसर्गावर मात करण्याचा मार्ग आहे, असं वाटत आहे. (Tata group said Faster vaccination will save people and economy from covid)

कोरोनाच्या लढाईत टाटा ग्रुप अग्रेसर

टाटा ग्रुपनं परदेशातून 60 क्रायोजेनिक टँकर आयात करण्याचा निर्णय घेतल्याची त्यासोबत 400 ऑक्सिजन प्लांट उभारण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती टाटा ग्रुपच्या अधिकाऱ्यानं दिली. याद्वारे निर्माण होणारा ऑक्सिजन छोट्या रुग्णालयांमध्ये वापरला जाऊ शकतो. याशिवाय टाटा ग्रुप कोल्ड स्टोरेजची चैन तायर करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे कोरोना प्रतिबंधक लसींना विशिष्ट तापमानात ठेवता येईल.

कोरोना लसीकरणात गती हवी

टाटा सन्सचे अध्यक्ष बनमाली अग्रवाल यांनी जितक्या वेगानं कोरोना लसीकरण करता येईल, तितक्या वेगात ते करावं असं म्हटलं आहे. जितकं वेगवान लसीकरण होईल तेवढ्या लोकांना सुरक्षित करता येईल. हा सुरक्षित मार्ग असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी भारत सरकारनं जग भरातील कोरोना प्रतिबंधक लसींना परवानगी दिली पाहिजे, असंही बनमाली अग्रवाल यांनी म्हटलं आहे. कोरोना लसींसाठी कोल्ड चेनची गरज असते. या दृष्टीनं आम्ही तयारी करत आहोत. सुदैवानं आमच्या ग्रुपकडे वोल्टास सारखी कंपनी आहे, असंही बनवाली अग्रवाल म्हणाले.

कोरोनावर मात करण्याच्या क्षमतेवर आर्थिक विकास

बनमाली अग्रवाल यांनी आपल्याला आरोग्य संबधी पायाभूत सुविंधासाठी दिर्घकालीन विचार करुन गुंतवणूक करण्याची गरज आहे, असं स्पष्ट केले. ही आपल्या देशासाठी महत्वाची बाब आहे. आपल्या कोरोना विषाणू संसर्गावर मात करण्याच्या क्षमतेवर भारताच्या आर्थिक विकासाची प्रगती अवलंबून असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आपल्यासमोर अन्य आव्हान आहेत पण कोरोनाला प्रतिबंद करु शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

इतर बातम्या:

अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईन : रामदास आठवले

मरावाड्यात कोरोनाता वाढता धोका, औरंगाबाद आणि परभणीत प्रशासनाकडून महत्वाचे निर्णय

Tata group said Faster vaccination will save people and economy from covid

नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?
नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?.
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला.
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी.
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती.
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग.
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक.
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार.
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.