Tomato Price : टोमॅटो घ्या अर्ध्या किंमतीत! भाव इतका स्वस्त, या राज्य सरकारवर कौतुकाचा वर्षाव

Tomato Price : देशात टोमॅटोच्या भावाने ग्राहक लालबुंद झाले आहेत. पण या राज्य सरकारने अर्ध्या किंमतीत टोमॅटोचा पुरवठा सुरु केला आहे. त्यामुळे या राज्य सरकारवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. 

Tomato Price : टोमॅटो घ्या अर्ध्या किंमतीत! भाव इतका स्वस्त, या राज्य सरकारवर कौतुकाचा वर्षाव
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 1:47 PM

नवी दिल्ली : टोमॅटोच्या किंमतींनी (Tomato Price) पहिल्यांदाच केंद्र सरकारच्या नाकात दम आणला आहे. अलनीनोचा मोठा प्रभाव यंदा देशभरात दिसत आहे. कमी उत्पादनामुळे टोमॅटोचा भाव गगनाला पोहचले आहेत. दलाल आणि मध्यस्थांवर अंकुश ठेवण्यात राज्य आणि केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र आहे. टोमॅटो 120-160 रुपये किलो दराने विक्री होत आहे. पाकिस्तानला नावं ठेवता ठेवता भारतात ही कृत्रिम महागाईने (Inflation) जनतेचा घात केला आहे. त्यांच्या दिवसा खिसा कापल्या जात आहे. पण केंद्र सरकार या प्रकरणी हतबल झाल्याचे बाजारातील चित्र स्पष्ट करते. पण या राज्य सरकारने जनतेला अर्ध्या किंमतीत टोमॅटो (Tomato Half Price) उपलब्ध करुन दिले आहे. या राज्य सरकारवर भारतातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

इथे महाग, या शहरात सर्वात स्वस्त भारतात टोमॅटोचा सरासरी दर गुरुवारी 95.58 रुपये प्रति किलोग्रम होता. उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे टोमॅटोचा भाव भारतात सर्वाधिक म्हणजे 162 रुपये प्रति किलोमग्रॅम होता. तर राजस्थानमधील चुरु येथे टोमॅटो 31 रुपये किलोने विक्री होत आहे.

या शहरात असा आहे भाव (प्रति किलो)

हे सुद्धा वाचा
  • मुंबई 108 रुपये
  • चेन्नई 117 रुपये
  • दिल्ली 120 रुपये
  • कोलकाता 152 रुपये
  • हैदराबाद 98 रुपये
  • बेंगळुरु 110 रुपये

तामिळनाडू पॅटर्न तामिळनाडू राज्यात सध्या टोमॅटोचा किरकोळ भाव 120 ते 160 रुपये प्रति किलो या दरम्यान आहे. टोमॅटोच्या किंमतींवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहे. पण सर्वसामान्य जनतेला स्वस्तात टोमॅटो मिळावा यासाठी राज्य सरकारने खास योजना आखली आहे.

राशन दुकानावर टोमॅटो तामिळनाडू सरकारने राशन दुकानावर टोमॅटो स्वस्तात उपलब्ध करुन देण्यास मंजूरी दिली आहे. त्यानुसार, आता स्वस्त धान्य दुकानावर टोमॅटो 60 रुपये किलो भावाने मिळेल. मंगळवारपासून चेन्नईतील अनेक स्वस्त धान्य दुकानावर स्वस्तात टोमॅटो विक्रीला सुरुवात करण्यात आली.

अशी झाली सुरुवात पहिल्या टप्प्यात राजधानी चेन्नईतील तीन विभागात ही योजना सुरु झाली. उत्तर, दक्षिण आणि मध्य चेन्नईतील स्वस्त धान्य दुकानात अर्ध्या किंमतीत टोमॅटो उपलब्ध करुन देण्यात आले. फार्म ग्रीन सेंटरवर पण स्वस्तात टोमॅटो मिळत आहे. तामिळनाडूमध्ये सहकारी समितीच्या दुकानांची संख्या वाढविण्यात आली असून त्याठिकाणी अर्ध्या किंमतीत टोमॅटो मिळत आहे. लवकरच योजना राज्यात सुरु करण्याचा शक्यता आहे.

अल-नीनो मुळे गणित बिघडले अलनीनोमुळे सध्या भारतीय पिकांचं आणि उत्पादनाचं गणित बिघडलं आहे. त्याचा विपरीत परिणाम भारतीय शेती आणि शेतकऱ्यांवर पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी टोमॅटो उत्पादनाला फटका बसला आहे. तर काही ठिकाणी व्यापारी साठेबाजी करत असल्याची ओरड होत आहे.

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.