AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mukesh Ambani : रिलायन्सच्या उभारणीत या व्यक्तीचाही मोठा वाटा! मुकेश अंबानी यांचा राईट हँड आहे तरी कोण?

Mukesh Ambani : रिलायन्स समूह उभारण्यात अंबानी कुटुंबियांची मोठी मेहनत आहे. पण या सोबतच आणखी काही दिग्गजांनी या समूहाला मोठे करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. ते रिलायन्सच कुटुबांचे एक भाग झाले आहेत. मोठ्या निर्णयात त्यांचा सल्ला मोलाचा मानण्यात येतो.

Mukesh Ambani : रिलायन्सच्या उभारणीत या व्यक्तीचाही मोठा वाटा! मुकेश अंबानी यांचा राईट हँड आहे तरी कोण?
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 9:27 AM

नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) देशातील सर्वात मोठा उद्योग समूह आहे. आपण जेव्हा रिलायन्स समूहातील (Reliance Group) थिंक टँकचा विचार करतो, तेव्हा अंबानी कुटुंबियांसोबतच, एका नावाची ही चर्चा होते. मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी हे तर प्रमुख आहेतच. या थिंक टँकमध्ये आणखी काही लोकांचा समावेश आहे. रिलायन्सच्या प्रमुख निर्णयात त्यांचा सल्ला मोलाचा मानण्यात येतो. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या उभारणीत त्यांचा ही मोठा हातभार आहे. मनोज मोदी (Manoj Modi) हे रिलायन्स विश्वातील मोठे नाव आहे. मुकेश अंबानी (Mukesh Ambani)यांचे ते उजवे हात मानल्या जातात. ते अंबानी यांचे वर्गमित्र पण आहेत. मुकेश अंबानी यांनी कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच त्यांच्या मित्रांनाही समूहात महत्वाचे अधिकार दिले आहेत.

मनोज मोदी (Manoj Modi) यांचे नाव तुम्हाला कदाचित माहिती नसेल. ते कोणत्याच बातमीत नसतात. पण रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोदी एक प्रमुख व्यक्ती आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रमुख निर्णयात त्यांचा सहभाग असतो. त्यांना मुकेश अंबानी यांचा उजवा हात संबोधण्यात येते.

फेसबुक सोबत 5.7 अब्ज डॉलरचा करार करण्यात मनोज मोदी यांची प्रमुख भूमिका होती. ते मुकेश अंबानी यांचे वर्गमित्र होते. दोघांनी अभियांत्रिकीचे सोबतच शिक्षण घेतले आहे. ते एमएम (MM) नावाने ओळखले जातात.

हे सुद्धा वाचा

मनोज मोदी यांच्याकडे अनेक वर्षांपासून कोणतेही पद नाही. पण त्यांच्या शब्दाला रिलायन्समध्ये मोठी किंमत आहे. रिलायन्सच्या प्रत्येक निर्णयामागे यांच्या मताला मोठे महत्व आहे. अनेक निर्णय घेण्यापूर्वी यांचा सल्ला मोलाचा असतो. ते रिलायन्स समूहात मोठ्या पदावर आहेत. त्यांच्या शब्दाशिवाय रिलायन्समध्ये पान हालत नाही. मनोज मोदी सध्या रिलायन्स रिटेल (Reliance Retail) आणि रिलायन्स जिओ (Reliance Jio) चे संचालक आहेत.

मनोज मोदी मुकेश अंबानी यांचे जुने मित्र आहेत. ते अभियांत्रिकी महाविद्यालपासून मित्र आहेत. या दोघांनी मुंबई विद्यापीठातून (Mumbai University) सोबतच इंजिनिअरिंग केले आहे. दोघांकडे केमिकल इंजिनिअरिंगची (Chemical Engineering) पदवी आहे.

मनोज मोदी 1980 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत जोडल्या गेले. त्यांनी अंबानींच्या तीन पिढ्यांसोबत काम केले आहे. एमएम यांनी धीरुभाई अंबानी यांच्यानंतर मुकेश अंबानी आणि आता ईशा, आकाश आणि अनंत यांच्यासोबत ही काम केले आहे.

2007 साली मनोज मोदी यांना संचालक पदी होते. मोदी हजीरा पेट्रोकेमिकल कॉम्पलेक्स, जामनगर रिफायनरी, टेलिकॉम उद्योग, रिलायन्स रिटेल, 4जी यासारख्या मोठ्या प्रकल्पात सहभागी होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लष्कराचं कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लष्कराचं कौतुक.
पाकमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त, हीच ती 9 ठिकाणं जिथं...
पाकमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त, हीच ती 9 ठिकाणं जिथं....
भारतीय लष्कराने कसा केला हल्ला, पाहा संपूर्ण घटनाक्रम
भारतीय लष्कराने कसा केला हल्ला, पाहा संपूर्ण घटनाक्रम.
तुझ्या सिंदूरचा बदला... इम्तियाज जलील ऑपरेश सिंदूरवर बघा काय म्हणाले?
तुझ्या सिंदूरचा बदला... इम्तियाज जलील ऑपरेश सिंदूरवर बघा काय म्हणाले?.
जखमी दहशतवाद्यांची भेट घेण्यासाठी पाकिस्तानी अधिकारी रुग्णालयात
जखमी दहशतवाद्यांची भेट घेण्यासाठी पाकिस्तानी अधिकारी रुग्णालयात.
त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले
त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले.
पिक्चर अभी बाकी है, ऑपरेशन सिंदूरनंतर त्या ट्वीटनं पाकला पुन्हा धडकी
पिक्चर अभी बाकी है, ऑपरेशन सिंदूरनंतर त्या ट्वीटनं पाकला पुन्हा धडकी.
मसुद अझरचं कुटुंब जिथे नेस्तनाभूत झालं, त्या कोटलीमधील फोटो आले समोर
मसुद अझरचं कुटुंब जिथे नेस्तनाभूत झालं, त्या कोटलीमधील फोटो आले समोर.
ऑपरेशन सिंदूरचे 3 मोठे शिकार, 5 टॉप कमांडरचा खात्मा, नावासह फोटो समोर
ऑपरेशन सिंदूरचे 3 मोठे शिकार, 5 टॉप कमांडरचा खात्मा, नावासह फोटो समोर.
दहशतवाद्याना प्रत्युत्तर देण्यास भारताने आपला अधिकार..- परराष्ट्र सचिव
दहशतवाद्याना प्रत्युत्तर देण्यास भारताने आपला अधिकार..- परराष्ट्र सचिव.