Solapur : सोलापुरातील जवानाला उत्तराखंडमध्ये वीरमरण, लष्कराचे वाहन दरीत कोसळले

या घटनेने सोलापूर करांच्या डोळ्यात पाणी उभा राहिलं आहे. त्यांच्या कुटुंबियांचा कंठही दाटला आहे. कारण उत्तराखंड येथे लष्कराच्या ताफ्यातील वाहन दरीमध्ये कोसळून झालेल्या अपघातामध्ये जवान गोरख चव्हाण (Gorakh Chavan Death) यांना वीरमरण आलेय.

Solapur : सोलापुरातील जवानाला उत्तराखंडमध्ये वीरमरण, लष्कराचे वाहन दरीत कोसळले
सोलापुरातील जवानाला उत्तराखंडमध्ये वीरमरणImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 7:41 PM

सोलापूर : सोलापूर जिल्हा आणि संबंध देशाच्या मनाला चटका लावून जाणारी एक घटना उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) घडलीय. कारण उत्तर घंडमधील एका अपघातात (Accident) सोलापूर आणि महाराष्ट्राने आपला सुपुत्र गमावला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने सोलापूर करांच्या डोळ्यात पाणी उभा राहिलं आहे. त्यांच्या कुटुंबियांचा कंठही दाटला आहे. कारण उत्तराखंड येथे लष्कराच्या ताफ्यातील वाहन दरीमध्ये कोसळून झालेल्या अपघातामध्ये जवान गोरख चव्हाण (Gorakh Chavan Death) यांना वीरमरण आलेय. जवान गोरख चव्हाण हे बार्शी तालुक्यातील रातंजन येथील रहिवासी आहेत. ह्या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे. गोरख चव्हाण हे बॉर्डर रोड ऑर्गनायजेशन मध्ये चालक या पदावर कार्यरत होते. हा अपघात आज आपल्या सर्वांवर काळ बनून कसोळला आहे.

अपघाताच्या घटना वाढल्या

उत्तराखंडमध्ये सैन्याच्या ताफ्यातील गाडी दरीत कोसळली अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. जवान गोरख चव्हाण हे गेल्या बारा वर्षांपासून बॉर्डर रोड ऑर्गनायजेशन मध्ये कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई – वडील ,पत्नी, 8 वर्षाचा मुलगा, 5 वर्षाची मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने रांतजण सह बार्शी तालुक्यावर शोककळा पसरली. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यात सीमेवर विविध पदावर कार्यरत असलेले तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अलिकडे घडणाऱ्या अशा घटना महाराष्ट्राची चिंता दिवसेंदिवस वाढवत आहे. याच्यावर बुधवारी शासकीय इतमामात रांतजन गावी अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती देण्यात आलीय.

महाराष्ट्रच्या डोळ्यात पाणी आणणारी घटना

आपल्या महाराष्ट्राला सैनिकांची एक मोठी परंपरा आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून जवान लष्करात भरती होतात. काही जिल्ह्यांना तर आपल्याकडे सैनिकांचे जिल्हे म्हणून ओळखले जाते. देशसेवेसाठी अनेक जवान पुढकार घेतात. त्यामुळे महाराष्ट्राची मान देशपातळीवर उंचावते. मात्र अशी घटना मनला चटका लावून जाते. या घटनेने त्यांच्या कुटुंबियांवर तर काळाचा डोंगर कोसळलाच आहे. मात्र संपूर्ण परिवारावर सध्या शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबियांना आत्ता आधाराची गरज आहे.

Achalpur Violence : अचलपूर दंगलीप्रकरणी आरोपींचा कोठडी मुक्काम 3 दिवसांनी वाढला, परिसरात नवे नियम

Buldhana Accident : बुलढाण्यात मलकापूरजवळ भीषण अपघात, 3 ठार एक गंभीर

Pune Protest : पुण्यात कात्रज पाणी प्रश्न पेटला, आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.