Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दीड वर्षापासून पगार नाही, डोक्यावर कर्जाचा बोजा वाढला; अखेर त्याने एक कागद घेतला अन्…

दीड वर्षापासून मालक पगार देत नव्हता. त्यामुळे वाढते कर्ज आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह याची चिंता त्यांना लागली होती. यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.

दीड वर्षापासून पगार नाही, डोक्यावर कर्जाचा बोजा वाढला; अखेर त्याने एक कागद घेतला अन्...
आर्थिक अडचणीला कंटाळलेल्या कामगाराने जीवन संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 11:04 PM

कल्याण / सुनील जाधव : दीड वर्षापासून पगार मिळाला नाही. यामुळे डोक्यावर कर्जाचा बोजा वाढत चालाल होता. यामुळे आर्थिक विवंचनेतून शहाड बंदरपाडा येथील लाकडाच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराने कारखान्यातच आपले जीवन संपवले. मालकाने मागील दिड वर्षांपासून पगार दिला नाही. यामुळे कर्ज फेडणे मुश्किल बनल्यामुळे कामगार मागील काही काळापासून वैफल्यग्रस्त होता. याच वैफल्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलले आणि जीवन संपवण्याचा मार्ग पत्करला. कैलास अहिरे असे कामगाराचे नाव असून, त्याच्या आकस्मिक मृत्यूने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

जीवन संपवण्याआधी लिहिलेल्या चिट्ठीतून समोर आले धक्कादायक सत्य

सर्वसामान्य कुटुंबातील कैलास अहिरे हे कारखान्यात प्रचंड मेहनत करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. कष्टाच्या जोरावर कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या कैलास यांना मागील दीड वर्षांपासून मात्र कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे फार कठीण बनले होते. ते ज्या ठिकाणी काम करीत होते, त्या वखारीच्या मालकाने मागील 16 महिन्यांपासून पगार दिला नाही. त्यामुळे कैलास यांना दररोजचा खर्च भागवण्यासाठी इतरांकडे हात पसरावे लागत होते. त्यातच कैलास यांच्या डोक्यावर कर्जाचा बोझा वाढत चालला होता.

एकीकडे या कर्जाचा बोजा आणि दुसरीकडे पत्नी-मुलांची चिंता अशा चक्रव्यूहात अडकल्यामुळे कैलास यांनी टोकाची भूमिका घेतली आणि जीवन संपवले. हा टोकाचा मार्ग पत्करण्याआधी लिहिलेल्या चिट्ठीत त्यांनी त्यांच्या वाट्याला आलेली व्यथा मांडली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत. तसेच गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.