AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्णव गोस्वामींसोबत अटकेत असलेले फिरोज शेख तीन दिवसांपासून एकाच कपड्यांवर?, मानवी हक्काचे उल्लंघन; वकिलाचा आरोप

गोस्वामी यांच्यासोबत अटकेत असलेले फिरोज शेख हे गेल्या तीन दिवसांपासून एकाच कपड्यावर आहेत. पोलिसांकूडन सहकार्य केलं जात नाही. त्यामुळे मानवाधिकारांचं उल्लंघन होत आहे, असा आरोप फिरोज शेख यांच्या वकील अ‌ॅड. नेहा राऊत यांनी केला.

अर्णव गोस्वामींसोबत अटकेत असलेले फिरोज शेख तीन दिवसांपासून एकाच कपड्यांवर?, मानवी हक्काचे उल्लंघन; वकिलाचा आरोप
Follow us
| Updated on: Nov 06, 2020 | 11:32 PM

रायगड : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच गोस्वामी यांच्यासोबत अटकेत असलेले फिरोज शेख हे गेल्या तीन दिवसांपासून एकाच कपड्यांवर आहेत. पोलिसांकूडन सहकार्य केलं जात नाही. त्यामुळे मानवाधिकारांचं उल्लंघन होत आहे, असा आरोप फिरोज शेख यांच्या वकील अ‌ॅड. नेहा राऊत यांनी केला. (lawyer of Feroz Sheikh alleges human rights has been violated in arnab goswami case)

रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक झाली. त्यांच्यासोबत फिरोज शेख आणि नितेश सारडा यांनादेखील अटक करण्यात आली. त्यापैकी फिरोज शेख यांच्या वकील अ‌ॅड. नेहा राऊत यांनी शेख यांना रायगड पोलिसांकडून सहकार्य केले जात नसल्याचा आरोप केला आहे. “फिरोज शेख हे मागील तीन दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत क्वारन्टाईन म्हणून एका शाळेत आहेत. ते तीन दिवसांपासून एकाच कपड्यांवर आहेत. त्यांना पोलिसांनी कपडेसुद्धा बदलायला दिलेले नाहीत,” असा आरोप शेख यांच्या वकील अ‌ॅड. नेहा राऊत यांनी केला. तसेच, पोलिसांकडून आलेले पेपर घेण्यासाठी त्यांना शाळेबाहेर कित्येक तास ताटकळत उभं राहांव लागतं. पोलिसांकूडन सहकार्य होत नाही असंही त्या म्हणाल्या आहेत. फिरोज शेख यांना वकिलांना भेटू दिलं जात नाही. वकिलांना आरोपी सारखी वागणूक मिळत आहे असा आरोप करत; पोलिसांकडून मानवी हक्कांचं उल्लंघन होत आहे, असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात फिरोज शेख आणि नितेश सारडा यांनादेखील अटक करण्यात आली. या तिघांनाही अलीबागच्या मुख्य़ न्यायालयाने बुधवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. त्यांना जामीन मिळावा आणि एफआयआर रद्द करावा म्हणून त्यांनी आज (6 नोव्हेंबर) न्यायालयाच याचिका दाखल केली होती. त्यावरील युक्तिवाद पूर्ण न झाल्याने ही सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. तर, अलिबाग पोलिसांनीही अलिबाग सत्र न्यायालयात याचिका दाखल करून अर्णव यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली आहे. त्यावरही उद्या (7 नोव्हेंबर) सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्या मुंबई उच्च न्यायालय आणि अलिबाग सत्र न्यायालयात काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या :

अर्णव गोस्वामींना हायकोर्टाकडून तूर्तास दिलासा नाहीच, आजची रात्र शाळेत, उद्या पुन्हा सुनावणी

Arnab Goswami | अर्णव गोस्वामी प्रकरण : न्यायालयात नेमकं काय घडलं?

Arnab Goswami| हरिश साळवे म्हणाले, अर्णवला जामीन दिल्यास आभाळ कोसळेल का? कोर्टात काय काय घडलं?

(lawyer of Feroz Sheikh alleges human rights has been violated in arnab goswami case)

दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू.
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया.
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?.