AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

HSC Exam | बारावीचा गणिताचा पेपर फुटला की नाही? शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरण, पुन्हा परीक्षा होणार?

इयत्ता बारावीचा गणित विषयाचा पेपर फुटल्याची सध्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये चर्चा आहे. विशेष म्हणजे या चर्चेमुळे गणिताची परीक्षा पुन्हा होईल की काय? असा प्रश्न उपस्थित झालेला. पण शिक्षण मंडळाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

HSC Exam | बारावीचा गणिताचा पेपर फुटला की नाही? शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरण, पुन्हा परीक्षा होणार?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 10:41 PM

मुंबई : राज्यात सध्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुक्रवारी गणिताचा पेपर झाला. हा पेपर सुरु होण्याआधी बुलडाण्यातील सिंदखेड राजा येथील परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरु होण्याच्या अर्धा तास आधी पेपर फुटल्याची बातमी समोर आलेली. विशेष म्हणजे प्रश्नपत्रिकेची दोन पानं सोशल मीडियावर व्हायरलही झालेली. त्यामुळे गणिताचा पेपर परत होईल, अशी चर्चा सुरु झालेली. याच चर्चांवर अखेर राज्य शिक्षण मंडळाकडून अधिकृतपणे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. सिंदखेडराजा येथे पेपर फुटीचा प्रकार असा काहीच घडलेला नाही. कारण तसं काही आढळलेलं नाही. त्यामुळे गणिताचा पेपर पुन्हा होणार नाही, असं स्पष्टीकरण शिक्षण मंडळाकडून देण्यात आलं आहे.

शिक्षण मंडाळाने नेमकं काय म्हटलंय?

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेअंतर्गत 3 मार्च 2023 रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली असल्याची बातमी वृत्त वाहिन्यावरून प्रसिध्द झाली आहे. तथापि, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही, यामुळे इयत्ता 12 वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.

या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे ही सकाळी साडेदहानंतर प्रसिद्ध झाली आहेत. मंडळ सूचनेनुसार सकाळ सत्रात साडेदहा वाजेपर्यंत व दुपार सत्रात अडीच वाजेपर्यंत परीक्षा दालनात परीक्षार्थींनी उपस्थित राहणे बंधनकारक केलेले आहे. त्या वेळेनंतर कोणत्याही विद्यार्थ्यास परीक्षा दालनात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे गणित विषयाचा पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही, असे मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

संबंधित घटनेबाबत सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात फिर्याद क्र. ००३७ अन्वये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहेत. त्यामुळे गणित या विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही. याची विद्यार्थी, शिक्षक, पालक व सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे ओक यांनी स्पष्ट केले आहे.

विधानसभेतही पडसाद

बुलडाण्यात परीक्षा सुरु होण्याच्या अर्धा तास आधी सिंदखेडराजा येथील परीक्षा केंद्रावरुन गणिताचा पेपर फुटल्याची बातमी समोर आलेली. गणिताचा पेपर सकाळी साडेदहा वाजता सोशल मीडियावर व्हायरल झाला. विशेष म्हणजे या प्रकरणाचे पडसाद विधीमंडळातही बघायला मिळाले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत या विषयी नाराजी व्यक्त केलेली.

पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?.
'वडिलांचा मृतदेह तिथेच ठेऊन मी.. ', हर्षल लेलेने सांगितला थरारक अनुभव
'वडिलांचा मृतदेह तिथेच ठेऊन मी.. ', हर्षल लेलेने सांगितला थरारक अनुभव.
वडिलांची वाढदिवसाच्या एक दिवसाआधी हत्या, चिमुकल्याने सांगितला थरार
वडिलांची वाढदिवसाच्या एक दिवसाआधी हत्या, चिमुकल्याने सांगितला थरार.
हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, तिथली वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी
हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, तिथली वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी.
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी.