आता कॉलेज विसरा कोचिंगला जा, महाराष्ट्रातील कोटा ठरलेला लातूर पॅटर्न आहे काय?
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचे शहर म्हणून कोटा अन् लातूर शहर उदयास आले आहे. त्याला कारण या शहरातील शाळा महाविद्यालयातील शिक्षण नाही तर कोचिंग क्लासेस आहेत. का अन् कसे निर्माण झाले कोचिंगचे फॅड? कोटा आणि लातूर पॅटर्न नेमका निर्माण कसा झाला?, तो विकसित कसा होत गेला?, त्याची उलाढाल आहे तरी किती? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या...

भारतीय शिक्षण प्रणालीचा प्रवास गुरुकुल ते व्यावसायिक कोचिंग व्हाय शाळा, महाविद्यालय असा झाला आहे. गुरुकुलमध्ये विद्यार्थी गुरुंच्या घरी म्हणजे आश्रमात जाऊन शिक्षण घेत होते. त्यासाठी कठोर नियम होते. गुरुकुलमध्ये जाऊन शिष्य गुरुंकडून विज्ञान, वेद, कला, साहित्य, शस्त्र चालवण्याचे आदी प्रकारचे शिक्षण घेत होते. त्या ठिकाणी गरीब श्रीमंत काहीच भेद नव्हता. अगदी राजा महाराजांची मुले गुरुकुलमध्ये शिक्षणासाठी येत होते. त्या गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांचा संपूर्ण विकास होत होता. काळानुसार शिक्षण बदलले. शिक्षण प्रणाली बदलली. गुरुकुलऐवजी शाळा, महाविद्यालये सुरु झालीत. शाळांमध्ये कठोर शिस्तीचे शिक्षक असायचे. त्यामुळे “छडी लागे छम छम विद्या येई घम घम” हा वाक्यप्रचार प्रचलित झाला. परंतु काळाच्या ओघात शाळांमध्ये छडीचा वापर बंद झाला. ...